शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत वाहिन्यांखालील अतिक्रमणांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:46 IST

जीविताला धोका : भूमाफियांकडून बळकावली जाते जागा

नवी मुंबई : अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखालील जागेचा रहिवासी तसेच व्यावसायिक वापर होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. यानंतरही संबंधित सर्वच प्रशासनांकडून डोळेझाक होत  आहे.

शहराच्या अनेक भागांतून अतिउच्च दाबाची विद्युत वाहिनी गेलेली आहे. या विद्युत वाहिनीपासून नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवू नये याकरिता जमिनीपासून पुरेशा उंचीवर त्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. तर त्याखालील जागा कोणत्याही कारणासाठी वापरण्यास मज्जाव करून रिक्त ठेवण्यात आली आहे. यानंतरही अतिउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखालील मोकळ्या जागेत झोपडपट्ट्या उभारल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐरोली सेक्टर २, सेक्टर २० यासह इतर ठिकाणी विद्युत वाहिनीखालीच झोपड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. भूमाफियांनी त्या जागा बळकावून झोपड्यांचे साम्राज्य उभारले असल्याचा आरोप प्रदीप काळे यांनी केला आहे. यामध्ये तिथल्या रहिवाशांवर मृत्यूची टांगती तलवार निर्माण झाली आहे. परंतु संपूर्ण परिस्थिती नजरेसमोर असताना लोकप्रतिनिधी व अधिकारी अर्थपूर्ण डोळेझाक करून गरिबांना मृत्यूच्या दाढेत ढकलत असल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून होत आहे. यामुळे भविष्यात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली एखादी दुर्घटना घडल्यास अधिकारी जबाबदार असतील, असा आरोप प्रदीप काळे यांनी केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईelectricityवीज