शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

एमएमआरडीएच्या उड्डाणपुलावर तीन महिन्यांतच पडले खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:15 AM

तीन महिन्यांच्या आतमध्ये पुलावर खड्डे पडले असून भुयारी मार्ग जलमय होऊ लागला आहे.

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवर एमएमआरडीएने दोन उड्डाणपूल व एक भुयारी मार्ग उभारला आहे. तीन महिन्यांच्या आतमध्ये पुलावर खड्डे पडले असून भुयारी मार्ग जलमय होऊ लागला आहे.सायन-पनवेल महामार्गाप्रमाणेच सर्वाधिक वाहतूक असलेला रस्ता म्हणून ठाणे-बेलापूरची ओळख आहे. या मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने २००७ मध्येच काँक्रीटीकरण केले आहे. यानंतरही वाहतूककोंडी होत असल्यामुळे एमएमआरडीएने घणसोली ते तळवली दरम्यान १४५१ मीटर लांबीचा, सविता केमिकलजवळ ५७६ मीटर लांबीचा व ‘लोकमत’ प्रेसजवळ ४८५ मीटर लांबीचा भुयारी मार्ग बांधला आहे. या तीनही प्रकल्पांवर १५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २१ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या तीनही प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले; परंतु तीन महिन्यांच्या आतमध्ये पुलावर खड्डे पडू लागले आहेत. भुयारी मार्गामध्ये पाणी साचू लागले आहे. खड्ड्यांमुळेअपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घणसोली उड्डाणपुलावर चार ते पाच मोठे खड्डे पडले आहेत. नवीन पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे येथील काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. पहिल्याच वर्षी खड्डे पडले असल्यामुळे पुढील पावसाळ्यात पुलाची चाळण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Potholeखड्डेNavi Mumbaiनवी मुंबई