शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कविता म्हणजे एकप्रकारे संवेदनांचा उत्सवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:29 IST

साहित्य समाजमनाचा आरसा आहे.

पनवेल : साहित्य समाजमनाचा आरसा आहे. कवितेच्या माध्यमातून साहित्य आणि समाज यांचे नाते दृढ होते. कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव आहे तर कवी संमेलन हे उत्सवांचा महोत्सव आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे केले.कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्तर-दक्षिण रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कवितांची कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्र माला माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप नेते वाय.टी.देशमुख यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्र मास सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, अरु ण म्हात्रे, कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, जनसंपर्क प्रमुख, रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख, नाटककार मोहन भोईर, उत्तर रायगड कोमसापचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, दक्षिण रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी सुखद राणे तसेच अ.वि.जंगम, सुनंदा देशमुख, सुधीर शेठ उपस्थित होते.मनुष्याचे रडणे-हसणे ही साहित्याची साधने असून बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली जाणार आहे, खऱ्या अर्थाने ही साहित्यिकांची फलश्रुती आहे, असे मत मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केले. सुप्रसिध्द कवी रामदास फुटाणे यांनी मार्गदर्शन करताना, साहित्यिक घडण्यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे. पुस्तके वाचून कविता तयार होत नाही, त्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. जितक्या स्वभावाचे लोक असतात तितक्या स्वभावाच्या कविता निर्माण होतात. सकस साहित्य कलाकृती व्हायची असेल तर अनुभूती असावी लागते. अवतीभोवती घडणाºया घटनांची साहित्यकृती निर्माण केली तर वाचकांच्या पसंतीस येते असे त्यांनी सांगितले. कवी अरु ण म्हात्रे यांनी कवितेची कुठेही शाळा नाही, कुठेही रजिस्टर नाही. कवी जो कविता सादर करतो त्याला रसिकांची दाद मिळते तेव्हा ती कविता उत्कृष्ट होते. शब्द साठा असणारे अनेक कवी आहेत. पण शब्दांपेक्षा भावनेतून कविता आली पाहिजे. काळजातून विद्रोह असला तर विद्रोही कविता निर्माण होते. कवी बनायचे असेल तर खूप कविता वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत असे सांगितले. दुपारच्या खुल्या कवी संमेलनात रायगड जिल्ह्यातील अनेक कवींनी कविता सादर केल्या. यावेळी मधु मंगेश कर्णिक, रामदास फुटाणे व अरुण म्हात्रे, नमिता कीर, प्रा.एल.बी.पाटील हे आवर्जून उपस्थित होते. हे कवी संमेलन अ‍ॅड.चंद्रकांत मढवी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्र मात रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड कोमसापच्या कवींना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अ‍ॅड.चंद्रकांत मढवी, नारायण सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला. खुल्या कवी संमेलनामध्ये झालेल्या काव्य स्पर्धेत जुईली आतीतकर हिने प्रथम क्र मांक, अरुण म्हात्रे यांनी द्वितीय क्र मांक, बी.डी.घरत यांना तृतीय क्र मांक तर दीपक सकपाळ आणि रवींद्र सोनावणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. संमेलनाचे सूत्रसंचालन जनार्दन सताणे, जयमाला जांभळे यांनी केले.