शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

कविता म्हणजे एकप्रकारे संवेदनांचा उत्सवच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:29 IST

साहित्य समाजमनाचा आरसा आहे.

पनवेल : साहित्य समाजमनाचा आरसा आहे. कवितेच्या माध्यमातून साहित्य आणि समाज यांचे नाते दृढ होते. कविता म्हणजे संवेदनांचा उत्सव आहे तर कवी संमेलन हे उत्सवांचा महोत्सव आहे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे केले.कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा व उत्तर-दक्षिण रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मार्केट यार्डमधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात कवितांची कार्यशाळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्र माला माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजप नेते वाय.टी.देशमुख यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्र मास सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, अरु ण म्हात्रे, कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर, जनसंपर्क प्रमुख, रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख, नाटककार मोहन भोईर, उत्तर रायगड कोमसापचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, दक्षिण रायगडचे अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी सुखद राणे तसेच अ.वि.जंगम, सुनंदा देशमुख, सुधीर शेठ उपस्थित होते.मनुष्याचे रडणे-हसणे ही साहित्याची साधने असून बारावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली जाणार आहे, खऱ्या अर्थाने ही साहित्यिकांची फलश्रुती आहे, असे मत मधु मंगेश कर्णिक यांनी यावेळी व्यक्त केले. सुप्रसिध्द कवी रामदास फुटाणे यांनी मार्गदर्शन करताना, साहित्यिक घडण्यासाठी भरपूर वाचन केले पाहिजे. पुस्तके वाचून कविता तयार होत नाही, त्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. जितक्या स्वभावाचे लोक असतात तितक्या स्वभावाच्या कविता निर्माण होतात. सकस साहित्य कलाकृती व्हायची असेल तर अनुभूती असावी लागते. अवतीभोवती घडणाºया घटनांची साहित्यकृती निर्माण केली तर वाचकांच्या पसंतीस येते असे त्यांनी सांगितले. कवी अरु ण म्हात्रे यांनी कवितेची कुठेही शाळा नाही, कुठेही रजिस्टर नाही. कवी जो कविता सादर करतो त्याला रसिकांची दाद मिळते तेव्हा ती कविता उत्कृष्ट होते. शब्द साठा असणारे अनेक कवी आहेत. पण शब्दांपेक्षा भावनेतून कविता आली पाहिजे. काळजातून विद्रोह असला तर विद्रोही कविता निर्माण होते. कवी बनायचे असेल तर खूप कविता वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत असे सांगितले. दुपारच्या खुल्या कवी संमेलनात रायगड जिल्ह्यातील अनेक कवींनी कविता सादर केल्या. यावेळी मधु मंगेश कर्णिक, रामदास फुटाणे व अरुण म्हात्रे, नमिता कीर, प्रा.एल.बी.पाटील हे आवर्जून उपस्थित होते. हे कवी संमेलन अ‍ॅड.चंद्रकांत मढवी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कार्यक्र मात रायगड जिल्हा परिषदेच्यावतीने रायगड कोमसापच्या कवींना रायगड भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अ‍ॅड.चंद्रकांत मढवी, नारायण सोनावणे यांचा सत्कार करण्यात आला. खुल्या कवी संमेलनामध्ये झालेल्या काव्य स्पर्धेत जुईली आतीतकर हिने प्रथम क्र मांक, अरुण म्हात्रे यांनी द्वितीय क्र मांक, बी.डी.घरत यांना तृतीय क्र मांक तर दीपक सकपाळ आणि रवींद्र सोनावणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. संमेलनाचे सूत्रसंचालन जनार्दन सताणे, जयमाला जांभळे यांनी केले.