शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

नवी मुंबई महापालिकेच्या ४३ शाळांत मुख्याध्यापक नसल्याचे चित्र; आरटीआयअंतर्गत उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 12:22 AM

शिक्षणावर होतोय केवळ १.२ टक्के खर्च

नवी मुंबई : दर्जेदार आणि आधुनिक शिक्षणाचा टेंभा मिरविणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या ४३ शाळांत मुख्याध्यापकच नसल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्याशिवाय शिक्षकांची अपुरी संख्या, वर्गखोल्यांची कमी व इतर साधनसामग्रीचा प्रकर्षाने अभाव असल्याचे महापालिकेने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

समाजसेवक सुधीर दाणी यांनी महापालिकेच्या शाळांची स्थिती, वर्ग खोल्या, विद्यार्थी व शिक्षकांची संख्या तसेच सध्या कार्यरत असलेले मुख्याध्यापक आदींची आरटीआयअंतर्गत माहिती मागितली होती. संबंधित विभागाने दाणी यांना दिलेल्या माहितीतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या शैक्षणिक वर्षात शिक्षकांचा पगार, इमारत निर्मित्ती, देखभाल खर्च व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मोफत शैक्षणिक साहित्यांपोटी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ५५ करोड ८२ लाख ४४ हजार १३३ रुपये खर्च केले आहेत.

महापालिकेच्या एकूण अर्थसंकल्पापैकी हे प्रमाण केवळ १.२ टक्के इतके असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या एकूण ७४ शाळा आहेत. यापैकी राज्य शिक्षण मंडळाच्या ७३ तर सीबीएसई बोर्डाची एक शाळा आहे. ४२ मराठी माध्यमाच्या ४२, तर इंग्रजी माध्यमाच्या २० आहेत. हिंदी माध्यमाच्या ९ तर उर्दू माध्यमाच्या २ शाळा आहेत. मराठी माध्यमासाठी एकूण ४६० शिक्षक व शिक्षिका आहेत. यात तर इंग्रजी माध्यमासाठी २०८, हिंदी माध्यमासाठी १५६, तर उर्दू माध्यमासाठी १५ शिक्षक आहेत. विशेष म्हणजे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार ७४ शाळांपैकी तब्बल ४३ शाळांत मुख्याध्यापकाची नियुक्तीच केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मराठी माध्यमाच्या २५, इंग्रजी माध्यमाच्या १३, हिंदी माध्यमाच्या ५ शाळेत मुख्याध्यापक नाहीत. उर्दू माध्यमाच्या दोनपैकी एका शाळेत मुख्याध्यापक नाही. एकूणच महापालिकेच्या एकूण शाळांपैकी ३२ शाळांत मुख्याध्यापक कार्यरत आहेत. तर ४३ शाळांत मुख्याध्यापकांची अद्याप नियुक्तीच केली नसल्याचे उघड झाले आहे.

चार हजार कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प असणारी महापालिका शैक्षणिक उपक्रमांवर केवळ १.२ टक्के इतकाच खर्च करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम म्हणून महापालिकेच्या शाळांत अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. अनेक शाळांमध्ये स्टाफ रूम व मुख्याध्यापक रूम नाहीत. तर काही शाळांत विज्ञान प्रयोगशाळा नसल्याचे समोर आले आहे. त्याशिवाय शिक्षक वर्गही अपुरा आहे. महापालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांसाठी स्वतंत्र शिक्षक असणे अभिप्रेत आहे. किमान जितके वर्ग तितके शिक्षक असणे गरजेचे आहे. परंतु शिक्षक कमी असल्याने अनेक शाळेत दोन वर्ग एकत्रित भरविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दाणी यांनी म्हटले आहे.

दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षण विभागात ठोस उपाययोजनांची गरज आहे. त्यानुसार पायाभूत सुविधांबरोबरच जितक्या इयत्ता किमान तेवढ्या वर्ग खोल्या, प्रत्येक वर्गाला स्वतंत्र एक शिक्षक, प्रत्येक शाळेला मुख्याध्यापकाची नियुक्ती, गणित, विज्ञान व इंग्रजी या महत्त्वाच्या विषयांसाठी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती तसेच एकूण अर्थसंकल्पाच्या ६ टक्के निधी केवळ शिक्षणावर खर्च करणे अपेक्षित आहे. - सुधीर लक्ष्मीकांत दाणी, आरटीआय कार्यकर्ता

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाSchoolशाळा