शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

नवी मुंबईसह पनवेलकर असह्य उकाड्याने झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:59 AM

किमान तापमानातही वाढ : उष्माघाताच्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ

नवी मुंबई : गेल्या आठवडाभरापासून काही अंशांनी घटलेले तापमान पुन्हा वाढले असून, नवी मुंबईकर या उकाड्याने त्रस्त झाले आहेत. शहरातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील तापमान ३८ अंशांवर गेले असून, उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी किमान तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. किमान तापमानातही वाढ झाली असून, हे तापमान ३९ अंशांवर पोहोचले आहे.नवी मुंबईतील आर्द्रता ४४ टक्के नोंदविण्यात आली आहे. यंदा एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच उन्हाची तीव्रता नागरिकांना अधिक मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली असून, ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वात जास्त त्रास जाणवत असून, उन्हामुळे उष्माघाताचे रु ग्ण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात वाढत असल्याचे सर्वेक्षण वाशीतील रुग्णालयाच्या वतीने नोंदविण्यात आले आहे. वाढलेल्या उष्मामुळे नागरिक हैराण झाले असून डोळे जळजळणे, अंगदुखी, डोकेदुखी, भूक मंदावणे आदी तक्रारींनी डोके वर काढले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार नागरिकांनी खाण्या-पिण्याबाबत काळजी घ्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. उन्हाच्या काहिलीपासून सुटका होण्यासाठी नागरिकांची पावले रसवंतिगृह, शीतपेयांकडे वळू लागली आहेत. शहाळे, लिंबू व इतर शीतपेयांची मागणीही प्रचंड वाढली आहे. माथाडी व इतर कष्टाची कामे करणाऱ्या नागरिकांना उकाड्याचा खूपच त्रास होऊ लागला आहे. उसाची मागणी सर्वाधिक वाढली आहे. तापमान ४०च्या पुढे गेल्यास लोकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. भरपूर पाणी पिणे, सावलीत राहणे, सुती आणि सैल कपडे घालणे, कडक उन्हात शारीरिक कष्टाची कामे न करणे, अशा सोप्या गोष्टींनी उष्माघाताचा धोका टाळता येतो. चक्कर यायला लागली असेल तर तुम्हाला उष्माघाताचा त्रास सुरू आहे, असे जाणून वेळेत वरील सोपे उपाय करणे पुढील मोठ्या धोक्यापासून वाचवू शकतात, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.उष्माघातावर उपचारआपल्या आजूबाजूला कोणाला उष्माघाताचा झटका आला वा त्रास होऊ लागला, तर त्वरित दवाखान्यात न्यावे.सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे आणि शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते.शरीराला ओल्या कपड्याने पुसून काढावे आणि व्यक्तीच्या आजूबाजूला हवा खेळती ठेवावी.बर्फ उपलब्ध असल्यास व्यक्तीच्या मानेवर, पाठीवर, काखेत आणि मांडीच्या सांध्यात बर्फाचा शेक द्यायला सुरु वात करावी. कारण वरील जागी रक्तप्रवाह संचय हा त्वचेच्या जवळच असतो व थंडतेमुळे शरीराचे उष्ण तापमान कमी व्हायला मदत होते.व्यक्तीवर पाण्याचा वर्षाव करावा किंवा त्या व्यक्तीला बाथटबमध्ये बुडवावे वा बर्फ टाकावा.व्यक्तीला मूर्च्छा आली असेल तर श्वसनक्रि येची तपासणी करावी.व्यक्ती शुद्धीवर आल्यावर त्याला पाणी पिण्यास द्यावे.ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात उष्माघाताची लागणउष्माघात हा प्रामुख्याने वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाºया लोकांमध्ये आढळतो. अर्भके व चार वर्षांपर्यंतची लहान मुले, पासष्टीच्या पुढील वृद्ध मंडळी यांना उष्माघाताचा त्रास अधिक सहजपणे होऊ शकतो, असे डॉ. मेहुल कालवाडीया यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांत आमच्याकडे येणाºया रु ग्णांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमाणात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानांमुळे ज्या ज्येष्ठ नागरिकांना हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आहे, त्यांना उष्माघाताची लागण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचेही कालवाडीया यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Temperatureतापमान