शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

चाकरमान्यांच्या मतांवर ग्रामीण नेत्यांची भिस्त, नवी मुंबईमधील बैठका वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:29 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील नेत्यांनी मुंबईसह नवी मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबईसह पनवेलमधील बैठकांचे प्रमाण वाढले आहे. पक्षांचे नेते व उमेदवार बैठकांना उपस्थित राहून नागरिकांना गावच्या विकासाचे साकडे घालत आहेत.मुंबई, नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणामधील चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. सातारा, पुणे, हातकणंगले, माढा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. सातारा व माढा मतदार संघामधील अनेक गावांमधील ७० ते ८० टक्के नागरिक वास्तव्यासाठी मुंबई, नवी मुंबईमध्ये आहेत. अनेकांची दोन्ही ठिकाणी मतदार संघामध्ये नावे आहेत. यामुळे ग्रामीण भागामधील नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. शिरुर मतदार संघामधील शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही वाशीमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. याशिवाय माढा मतदार संघामधील कार्यकर्त्यांचा व माथाडी कामगारांचा मेळावा राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये कळंबोलीमध्ये आयोजित केला होता. या मेळाव्यामध्येही माथाडी कामगारांना गावाकडे चलाचे आवाहन करण्यात आले होते. सातारा - जावली मतदार संघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी एक महिन्यामध्ये दोन वेळा नवी मुंबईमध्ये हजेरी लावून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. सातारा व पुणे जिल्ह्यामधील चाकरमान्यांच्या विभागनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. यावेळी मुंबई व गावाकडील मतदानाच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. यामुळे सर्वप्रथम गावी येवून मतदानामध्ये सहभाग घ्यावा. गावच्या विकासामध्ये सर्वांचे योगदान हवे, असे भावनात्मक आवाहन केले जात आहे.यापूर्वी गावाकडील पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गावचे राजकारण चालत होते, परंतु मागील काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. मुंबईमध्ये रोजीरोटीसाठी आलेल्या नागरिकांनी आर्थिक प्रगती केल्याने गावच्या राजकारणामध्ये चाकरमान्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. २००० च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माथाडी कामगारांनी गावी जाऊन निकाल बदलला होता. तेव्हापासून ग्रामीण नेत्यांनी मुंबईमधील चाकरमान्यांशी संवाद वाढविण्यास सुरुवात केली. मुंंबईकरांचे मत वळविले की पूर्ण गावचे मत वळते असे समीकरण अनेक ठिकाणी निर्माण झाल्यामुळेच सर्वच राजकीय पक्षांनी मेळावे व बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईकरांना गावी घेऊन जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यापासून सर्व प्रकारची मदत देण्याची तयारीही दाखविली जात आहे. राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना व भाजपाने चाकरमान्यांची मते मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली असून ही मते नक्की कोणाच्या वाट्याला येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शिरुरमध्ये लागणार कसोटीसातारा, माढा, हातकणंगले, रत्नागिरी - सिंधुदुर्ग, शिरुर, बारामती मतदार संघामध्ये चाकरमान्यांची मते निर्णायक ठरत आहेत. या मतदार संघामधील नवी मुंबई, पनवेल, ठाणे व मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्यांची संख्या जास्त आहे. गावाकडील व मुंबई, नवी मुंबईमधील मतदानाची तारीख वेगळी असल्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. फक्त शिरुर व मुंबई, नवी मुंबईमधील मतदान एकाच दिवशी असल्यामुळे त्या मतदार संघातील उमेदवारांची मतदार गावी घेऊन जाण्यासाठी कसोटी लागणार आहे.माथाडी मेळाव्याकडेही लक्ष२३ मार्चला माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांची पुण्यतिथी आहे. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये माथाडी मेळाव्यामधून राष्ट्रवादी काँगे्रसच्या प्रचारास आरंभ केला जात होता. यावर्षी माथाडी संघटना भाजपा व राष्ट्रवादी अशा दोन पक्षांमध्ये विभागली आहे. यामुळे माथाडी मेळाव्यामध्ये नक्की कोणती भूमिका घेतली जाणार याविषयी उत्सुकता असून कामगार माथाडी नेत्यांचे ऐकणार की स्वत:ची भूमिका स्वत: ठरविणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान