शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

कांदा-बटाटा मार्केट खाली करण्याची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 04:27 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा-बटाटा मार्केट अतिधोकादायक घोषित केले आहे. मार्केटचा वापर थांबवून ते तत्काळ खाली करण्याचे फलक पालिकेने लावले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई  -  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कांदा-बटाटा मार्केट अतिधोकादायक घोषित केले आहे. मार्केटचा वापर थांबवून ते तत्काळ खाली करण्याचे फलक पालिकेने लावले आहेत. १५ वर्षांपासून व्यापारी, कामगार व ग्राहक जीव मुठीत धरून व्यवसाय करत आहेत. २५ हजार नागरिकांचा जीव धोक्यात असून, पुनर्बांधणीचा प्रश्न कधी मार्गी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील ३७८ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या असून, त्यामध्ये कांदा-बटाटा मार्केटचाही समावेश आहे. राज्य शासनाने मुंबईमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी बाजार समितीची पाच मार्केट नवी मुंबईमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय ८०च्या दशकामध्ये घेतला. १९८१मध्ये सर्वप्रथम कांदा-बटाटा मार्केट स्थलांतर करण्यात आले. सिडकोने येथील पाचही मार्केटचे बांधकाम केले; पण बांधकामाचा दर्जा चांगला नसल्याने २० वर्षांमध्ये मार्केट धोकादायक बनले. पिलरला तडे गेले. धक्क्यांची दुरवस्था झाली. छताचे प्लास्टर कोसळू लागले. मार्केटसमोरील सज्जा कोसळू लागला. वारंवार छताचा भाग कोसळू लागल्यामुळे मार्केटचे संरचनात्मक परीक्षण करण्यात आले व अखेर २००३मध्ये महापालिकेने काही विंग धोकादायक घोषित केल्या. संचालक मंडळाने पुनर्बांधणीचा निर्णय घेतला; पण व्यापारी संघटना न्यायालयात गेल्यामुळे हा प्रश्न रखडला होता. अखेर २००५मध्ये न्यायालयाने एल आकारामध्ये मॉल उभारावा व उर्वरित जागेमध्ये व्यापाऱ्यांना मोफत मार्केट उभारून द्यावे, असे आदेश दिले होते; परंतु त्यानंतरही विविध अडथळ्यांमुळे मार्केटची पुनर्बांधणी रखडली असून, सद्यस्थितीमध्ये संचालक मंडळ नसल्याने न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यास प्रशासकीय मंडळाला मनाई केली आहे.महापालिकेने मार्केटचा वापर थांबविण्याची नोटीस बाजार समितीला व व्यापाºयांना दिली आहे. दोन्ही प्रवेशद्वारावर फलक लावले आहेत. यामुळे व्यापाºयांमध्येही संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. मार्केट धोकादायक घोषित केल्यानंतर व्यापाºयांनी स्वखर्चाने गाळ्यांवर शेड टाकले आहे. माल ठेवायच्या जागेच्या वरील छत कोसळू नये, यासाठी लोखंडी खांबांचे टेकू देण्यात आले आहेत. आवश्यक तिथे प्लास्टरही केले आहे; परंतु संपूर्ण मार्केटचीच स्थिती बिकट झाली असून, टेकू लावायचे तरी कुठे व किती? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वाधिक असुरक्षिततेची भावना माथाडी कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. कामगारांचा वावर असलेल्या ठिकाणी छतामधील लोखंड दिसू लागले आहे. प्लास्टर वारंवार कोसळत आहे. अपघात होऊन जीवितहानी होण्यापूर्वी पुनर्बांधणीचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा कामगारांनी व्यक्त केली.कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी करण्याचे विचाराधीन आहे; परंतु प्रशासकीय मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. महापालिकेने अतिधोकादायक इमारतींमध्ये मार्केटचा समावेश केला असून, मार्केट खाली करण्याची नोटीस दिली आहे. ही बाब पुन्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल.- सतीश सोनी, मुख्य प्रशासक, बाजार समितीकांदा-बटाटामार्केटचा तपशीलक्षेत्रफळ ७.९२ हेक्टरएकूण गाळे २४३गाळ्यांचे क्षेत्रफळ ६७ चौ.मीलिलावगृह २५५० चौ.मीमध्यवर्ती इमारत ३९९६ चौ.मीरोजची वर्दळ २५ हजार

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या