शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

कार्यकर्ते प्रचाराबाबत निरुत्साही, नवी मुंबईतील नेत्यांची बैठकांसह रॅलीसाठी धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 23:33 IST

ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १३ दिवस राहिले असूनही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचाराला गती आलेली नाही.

नवी मुंबई : ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १३ दिवस राहिले असूनही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचाराला गती आलेली नाही. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. अद्याप घरोघरी संपर्काची एक फेरीही पूर्ण झालेली नाही. नेते रॅलीसह बैठकांमध्ये व्यस्त असून, कार्यकर्त्यांमधील निरुत्साह सर्वांसाठीच डोकेदुखी ठरला आहे.मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या उमदेवाराचा प्रचार वेगाने सुरू आहे. पनवेलसह उरणमध्ये नेत्यांसह कार्यकर्तेही उत्साहाने प्रचार करत असताना, दुसरीकडे नवी मुंबईमधील बेलापूर व ऐरोली मतदारसंघामध्ये अद्याप प्रचारामध्ये उत्साह निर्माण झालेला नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेऊन कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. ऐरोली मतदारसंघामध्ये उमेदवार आनंत परांजपे यांच्या रॅलीचेही आयोजन केले जात आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीही काँगे्रस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. शिवसेनेचे राजन विचारे यांच्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असे आवाहन केले आहे. स्वत: विचारे यांच्यासह विजय नाहटा, आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले आहेत.दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन व नागरिकांच्या भेटी घेण्याचे आवाहन केले आहे; प्रत्यक्षात कार्यकर्ते प्रचारात उतरलेले नाहीत. अनेक कार्यकर्त्यांपर्यंत प्रचाराचे साहित्यही पोहोचलेले नाही. रविवारची सुट्टी असल्यामुळे नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे शक्य होते; परंतु कोणत्याच प्रभागामध्ये स्थानिक कार्यकर्ते प्रचार करताना दिसले नाही.प्रचाराविषयी माहिती घेण्यासाठी प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली असता अद्याप घरोघरी प्रचार सुरू झालेला नसल्याचे मान्य केले. कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. सर्वांना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले आहे; पण सोशल मीडियावरून उमेदवाराची माहिती पाठविण्यावरच अद्याप सर्वांचा भर आहे. प्रभागांमधील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याचे सांगण्यात आले. काही पदाधिकारी, प्रचार साहित्य मिळाले नसल्याचे सांगत आहेत. कार्यकर्त्यांमधील हा निरूत्साह नेत्यांसाठी डोकेदुखी बनला असून, पुढील १३ दिवसांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे, अशा सूचना पदाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.>मतदानाची तारीखही माहिती नाहीनवी मुंबईमधील नागरिकांपर्यंत उमेदवारांची माहिती पोहोचविण्यामध्ये कार्यकर्ते अपयशी ठरले आहे. अनेक नागरिकांना अद्याप मतदानाची तारीखही माहिती नाही. नागरिकांशी चर्चा केली असता काही जण २३ तारखेला मतदान असल्याचे सांगू लागले आहेत. निवडणूक विभागासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी नागरिकांच्या मनावर मतदानाची तारीख बिंबविण्यातही अपयशी ठरले आहेत.>परवानग्यांसाठी धावपळप्रचारासाठी रॅली व सभांना परवानग्या मिळविणे सुलभ व्हावे यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली आहे. विधानसभा क्षेत्रातील निवडणूक विभागाच्या कार्यालयामध्ये त्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु प्रत्यक्षात रॅलीसाठी परवानगी घेण्यासाठी कार्यकर्त्यांना संंबंधित पोलीस स्टेशनमध्ये पाठविले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ होऊ लागली आहे.>नेत्यांभोवती घुटमळत आहेत कार्यकर्तेप्रचारासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या प्रभागावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश पदाधिकारी नेत्यांची बैठक असलेल्या ठिकाणी घुटमळताना दिसत आहेत. रॅलीत व इतर ठिकाणी नेत्यांना व उमेदवारांना आपण दिसू याची काळजी घेतली जात आहे. नेत्यांभोवती फिरण्यापेक्षा प्रभागामधील घरोघरी जाण्याच्या सूचना देऊनही अद्याप फारसा फरक पडलेला नाही.>रविवारची संधीही गेलीनवी मुंबई परिसरामधील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसायासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिक घरी असतात. शनिवारी रामनवमीची सुट्टी व रविवारची साप्ताहिक सुट्टी असतानाही एकाही राजकीय पक्षाचे उमेदवार नागरिकांच्या घरापर्यंत पोहचलेले नाहीत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Ganesh Naikगणेश नाईक