शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कार्यकर्ते प्रचाराबाबत निरुत्साही, नवी मुंबईतील नेत्यांची बैठकांसह रॅलीसाठी धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 23:33 IST

ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १३ दिवस राहिले असूनही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचाराला गती आलेली नाही.

नवी मुंबई : ठाणे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी १३ दिवस राहिले असूनही नवी मुंबईमध्ये अद्याप प्रचाराला गती आलेली नाही. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साहाचे वातावरण आहे. अद्याप घरोघरी संपर्काची एक फेरीही पूर्ण झालेली नाही. नेते रॅलीसह बैठकांमध्ये व्यस्त असून, कार्यकर्त्यांमधील निरुत्साह सर्वांसाठीच डोकेदुखी ठरला आहे.मावळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या उमदेवाराचा प्रचार वेगाने सुरू आहे. पनवेलसह उरणमध्ये नेत्यांसह कार्यकर्तेही उत्साहाने प्रचार करत असताना, दुसरीकडे नवी मुंबईमधील बेलापूर व ऐरोली मतदारसंघामध्ये अद्याप प्रचारामध्ये उत्साह निर्माण झालेला नाही. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेऊन कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. ऐरोली मतदारसंघामध्ये उमेदवार आनंत परांजपे यांच्या रॅलीचेही आयोजन केले जात आहे. माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनीही काँगे्रस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. शिवसेनेचे राजन विचारे यांच्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळावा घेऊन कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये, असे आवाहन केले आहे. स्वत: विचारे यांच्यासह विजय नाहटा, आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह अनेक नेत्यांनी कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले आहेत.दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन व नागरिकांच्या भेटी घेण्याचे आवाहन केले आहे; प्रत्यक्षात कार्यकर्ते प्रचारात उतरलेले नाहीत. अनेक कार्यकर्त्यांपर्यंत प्रचाराचे साहित्यही पोहोचलेले नाही. रविवारची सुट्टी असल्यामुळे नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेणे शक्य होते; परंतु कोणत्याच प्रभागामध्ये स्थानिक कार्यकर्ते प्रचार करताना दिसले नाही.प्रचाराविषयी माहिती घेण्यासाठी प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केली असता अद्याप घरोघरी प्रचार सुरू झालेला नसल्याचे मान्य केले. कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. सर्वांना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले आहे; पण सोशल मीडियावरून उमेदवाराची माहिती पाठविण्यावरच अद्याप सर्वांचा भर आहे. प्रभागांमधील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याचे सांगण्यात आले. काही पदाधिकारी, प्रचार साहित्य मिळाले नसल्याचे सांगत आहेत. कार्यकर्त्यांमधील हा निरूत्साह नेत्यांसाठी डोकेदुखी बनला असून, पुढील १३ दिवसांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे, अशा सूचना पदाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.>मतदानाची तारीखही माहिती नाहीनवी मुंबईमधील नागरिकांपर्यंत उमेदवारांची माहिती पोहोचविण्यामध्ये कार्यकर्ते अपयशी ठरले आहे. अनेक नागरिकांना अद्याप मतदानाची तारीखही माहिती नाही. नागरिकांशी चर्चा केली असता काही जण २३ तारखेला मतदान असल्याचे सांगू लागले आहेत. निवडणूक विभागासह राजकीय पक्षाचे पदाधिकारी नागरिकांच्या मनावर मतदानाची तारीख बिंबविण्यातही अपयशी ठरले आहेत.>परवानग्यांसाठी धावपळप्रचारासाठी रॅली व सभांना परवानग्या मिळविणे सुलभ व्हावे यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू केली आहे. विधानसभा क्षेत्रातील निवडणूक विभागाच्या कार्यालयामध्ये त्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे; परंतु प्रत्यक्षात रॅलीसाठी परवानगी घेण्यासाठी कार्यकर्त्यांना संंबंधित पोलीस स्टेशनमध्ये पाठविले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ होऊ लागली आहे.>नेत्यांभोवती घुटमळत आहेत कार्यकर्तेप्रचारासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने त्यांच्या प्रभागावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे; परंतु बहुतांश पदाधिकारी नेत्यांची बैठक असलेल्या ठिकाणी घुटमळताना दिसत आहेत. रॅलीत व इतर ठिकाणी नेत्यांना व उमेदवारांना आपण दिसू याची काळजी घेतली जात आहे. नेत्यांभोवती फिरण्यापेक्षा प्रभागामधील घरोघरी जाण्याच्या सूचना देऊनही अद्याप फारसा फरक पडलेला नाही.>रविवारची संधीही गेलीनवी मुंबई परिसरामधील बहुतांश नागरिक नोकरी, व्यवसायासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत घराबाहेर असतात. रविवार व इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिक घरी असतात. शनिवारी रामनवमीची सुट्टी व रविवारची साप्ताहिक सुट्टी असतानाही एकाही राजकीय पक्षाचे उमेदवार नागरिकांच्या घरापर्यंत पोहचलेले नाहीत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Ganesh Naikगणेश नाईक