शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

'जाहिराती बघून तेल, साबण निवडायचा असतो, सरकार नव्हे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 16:13 IST

आज (रविवार) नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता.

नवी मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यात शिवस्वराज्य यात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आज (रविवार) नवी मुंबईतराष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हेंनी सरकारच्या जाहिरातींवर सडकून टीका केली आहे.

नवी मुंबईतील मेळाव्यात अमोल कोल्हें म्हणाले की, महाराष्ट शासन न केलेली काम तुमच्या आमच्या माथी मारण्यासाठी राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकाराची प्रत्येकी तासाला 10 जाहिराती दाखविली जाते, एक जाहिरातीसाठी साधरणत: 12 हजार रुपये इतका खर्च करवा लागतो. त्यामुळे राज्य सरकार दिवसातील चार तासांसाठी तुमच्या आमच्या खिशातील जवळपास २० ते २२ लाख रुपये हे जाहिरातींवर खर्च करत असल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे. त्याचप्रमाणे 2014च्या निवडणुकीनंतर समजले की पूर्वी आई- वडिल सांगायचे जाहिराती बघून तेल आणि साबण यांच्यासारख्या वस्तू निवडायच्या असतात सरकार निवडायचे नसते, असं म्हणत त्यांनी शासनाच्या जाहिरांतींवर टीकास्त्रं सोडलं आहे.

अमोल कोल्हेंनी याआधी देखील शिवस्वराज्य यात्रेत  माझ्या मनात ईव्हीएमविषयी शंका आहेच, परंतु मी ईव्हीएम संर्दभात बोलायला लागलो की 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच फेसबुक आणि व्हॅाट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून ईव्हीएमविषयी तुम्हाला शंका आहे तर, तुम्ही कसे निवडून आलात असे प्रश्न विचारतात. मात्र जर ईव्हीएम नसतं, तर शिरुरमधून एक शेतकऱ्याचा साधा पोरगा फक्त साठ हजारांच्या मताधिक्याने निवडून आला नसता असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मी राजीनामा देण्यास तयार असून आता ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्यास दोन-अडीच लाखांनी निवडून नाही आलो, तर माझं नाव बदला असं ओपन चॅलेंज अमोल कोल्हेंनी दिले होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAdvertisingजाहिरातElectionनिवडणूकBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई