शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
2
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
3
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
4
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
5
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
6
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
7
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
8
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
9
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
10
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
11
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
12
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
13
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
14
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
15
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
16
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
17
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
18
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
19
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
20
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले

इमारतीवर पत्र्यांचे शेड : गृहनिर्माण सोसायट्यांना महापालिकेच्या नोटिसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:50 IST

NMMC News : पावसामुळे इमारतीला लागणारी गळती रोखली जावी, यासाठी नवी मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांनी आपल्या इमारतींवर पत्र्याचे शेड लावले आहेत. परंतु, शेड टाकण्यासाठी परवानगी नसल्याचे कारण देत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून नोटिसा बजावल्या जात आहेत. 

नवी मुंबई -  पावसामुळे इमारतीला लागणारी गळती रोखली जावी, यासाठी नवी मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांनी आपल्या इमारतींवर पत्र्याचे शेड लावले आहेत. परंतु, शेड टाकण्यासाठी परवानगी नसल्याचे कारण देत महापालिकेच्या संबंधित विभागाकडून नोटिसा बजावल्या जात आहेत. प्रत्यक्ष कारवाई न करता सोसायटीतील पदाधिकाऱ्यांकडून चिरीमिरी घेवून प्रकरण मिटविले जात आहे. मागील काही दिवसांपासून असे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या संबंधित विभागाच्या विरोधात नागरिकांत असंतोष आहे.सिडकोने बांधलेल्या इमारती अल्पावधीतच मोडकळीस आल्या आहेत. धोकादायक ठरलेल्या या इमारतीतून हजारो रहिवासी जीव मुठीत घेवून राहत आहेत. पावसाळ्यात अनेक इमारतींच्या भिंतीतून पाण्याचा झरा वाहताना दिसतो. या पार्श्वभूमीवर अनेक इमारतींच्या छतावर पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. ऊन व पावसापासून इमारतीचे संरक्षण करणे हाच यामागचा हेतू आहे. परंतु, महापालिकेच्या संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी विविध कारणे पुढे करून इमारतीतील रहिवाशांना वेठीस धरताना दिसत आहेत. पावसाळ्यात गळती रोखण्याबरोबरच इमारतीवरील पत्रे इतर वेळी सोसायटीच्या विविध कारणांसाठी उपयुक्त ठरतात. मात्र, महापालिका अधिनियमानुसार आणि न्यायालयांनी दिलेल्या आदेशानुसार हे पत्र बेकायदा ठरविले जात आहेत. नागरिकांच्या तक्रारीमुळे पत्र्याची शेड बेकायदा ठरवून काढण्यासाठी नोटीस दिली जाते. पालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात सरसकट सर्वच इमारतींवरील पत्र्यांचे छत अनधिकृत ठरवून त्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. या कारवाईला सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर ही कारवाई स्थगित केली होती. परंतु, मागील काही दिवसांपासून अशा शेडसना पुन्हा नोटिसा पाठविल्या जात आहेत. त्यामुळे रहिवाशांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.भूमिकेविषयी नागरिकांना संशयनोटिसा बजावणाऱ्या महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेविषयीसुध्दा नागरिकांनी संशय व्यक्त केला आहे. कारण, नोटीस बजावल्यानंतर महापालिकेचे संबंधित अधिकारी लगेच इमारतीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेवून कारवाई टाळण्यासाठी आर्थिक तडजोड केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिकाNavi Mumbaiनवी मुंबई