शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी भाजीमार्केटचे खारघरमध्ये स्थलांतर; सिडकोने उपलब्ध केला भूखंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 06:26 IST

एक हजार चौरस फुटाचे १३०० तात्पुरते गाळे तयार करण्याचे काम सुरू

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील गर्दी कमी न झाल्यास मार्केट तात्पुरत्या स्वरूपात खारघरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिडकोने यासाठी जवळपास ५० एकर भूखंड उपलब्ध करून दिला असून १ हजार चौरस फुटाचे जवळ १२०० ते १३०० गाळे तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.

मुंबई, नवी मुंबई परिसरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. भाजी मार्केटमधील होणारी गर्दी पहाता, कोरोनाचा प्रसार होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजना कमी पडू लागल्या आहेत. पुढील दोन दिवसात गर्दी कमी न झाल्यास भाजी मार्केट खारघरमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड, सिडको व बाजार समिती प्रशासनाला त्याविषयी सूचना केल्या आहेत. सिडकोने तत्काळ खारघर सेक्टर २८, २९ मधील भूखंड तात्पुरत्या स्वरूपात भाजी मार्केट स्थलांतर करण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. भुखंडाची साफसफाई करून तेथे भाजी मार्केट उभारण्याचे काम सुरू आहे.

भाजी मार्केटमध्ये ९७६ गाळे असून विस्तारीत मार्केटमध्ये २८५ गाळे आहेत. हे गाळे २०० चौरस फूटाचे असून एकाला एक लागून आहेत. यामुळे मार्केट मध्ये प्रचंड गर्दी होत आहे. खारघरमध्ये मुळ मार्केटच्या पाच पट मोठ्या आकाराचे गाळे तयार केले जाणार आहेत.

एस टी डेपोच्या भूखंडाचा वापर

बाजार समितीच्या फळ मार्केटला लागून एस टी डेपोचा भूखंड मोकळा आहे. त्या भुंखंडाची ही साफसफाई करण्यात आली आहे. त्या भूखंडावर टोमॅटो व्यापाऱ्यांना स्थलांतर करण्याचा विचार सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती