शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

बाजार समितीचा नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 1:12 AM

गर्दीचा महापूर : भाजीसह फळ मार्केटमुळे शहरात कोरोनाचा स्फोट : मार्केटमध्ये पहाटे चक्काजाम

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला व फळ मार्केट कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. अनेक प्रतिष्ठित व्यापारी व कामगारांचा मृत्यू झाल्यानंतरही मार्केटमधील गर्दी कमी केली जात नाही. दोन्ही मार्केटमध्ये गर्दीचा महापूर येत असून, सोशल डिस्टन्सिंग, मास्क व संचारबंदीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. मार्केटमुळे शहरातही कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असून महानगरपालिका, पोलीस व बाजार समिती प्रशासनाने दोन्ही ठिकाणी कडक निर्बंध लादले नाहीत तर नवी मुंबईतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.            नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रतिदिन १ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढत असून, ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. महानगरपालिका व पोलीस प्रशासन शहरातील कोणत्याही दुकानासमोर पाच पेक्षा जास्त ग्राहक दिसले तर त्यांना ५ हजारपासून १५ हजारपर्यंत दंड आकारत आहेत. रोडवरून चालताना एका व्यक्तीनेही मास्क घातला नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे; परंतु बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन ६० ते ८० हजारांची गर्दी हाेत आहे. यांमधील जवळपास २५ ते ३० हजारांची गर्दी फक्त भाजीपाला व फळ मार्केटमध्ये होत आहे. सोमवारी फळ मार्केटमध्ये तब्बल ६३६ वाहनांची आवक झाली. मार्केटमध्ये वाहने उभी करण्यासाठीही जागा नव्हती. सर्व विंगमध्ये चक्काजामची स्थिती झाली होती.            भाजीपाला मार्केटमध्येही सोमवारी ५४१ वाहनांची गर्दी झाली. मार्केटमध्ये चालण्यासाठीही जागा नव्हती. प्रत्येक विंगमध्ये अत्यंत दाटी-वाटीने व्यापर केला जात होता. डी विंगमध्ये सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर यांपैकी कोणत्याच नियमांचे पालन केले जात नव्हते. मार्केटच्या बाहेर वाहतूक पोलीस चौकी ते माथाडी भवन रोडवरही चक्काजाम झाले होते. वाहतूक ठप्प झाली होती.

डी विंगमध्ये अनधिकृत व्यापारभाजी मार्केटच्या डी विंगमध्ये सर्वाधिक गर्दी होत आहे. त्या ठिकाणी अनधिकृत किरकोळ विक्री केली जात आहे. परवाना नसणारांना पोटभाडेकरू म्हणून व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे येथे प्रचंड गर्दी होत असून, कोरोनाचा फैलाव वाढत आहे.

आवक मर्यादित हवीबाजार समितीमध्ये गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक मार्केटमधील आवक यावर निर्बंध लादणे आवश्यक आहेत. जास्तीत जास्त माल मार्केटमध्ये न आणता थेट ग्राहकांपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. २०० ते ३०० पेक्षा जास्त वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश बंद करणे आवश्यक आहे. कोरोनाविषयी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

मनपासह पोलीस आयुक्तांचेही दुर्लक्षबाजार समितीच्या भाजीपाला व फळ मार्केटमध्ये पहाटे सहा ते नऊ या वेळेत चक्काजाम होत आहे. दोन मार्केटमध्ये २५ ते ३० हजार नागरिकांचा जमाव व्यापारासाठी एकत्र येत आहे. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. शहरात सर्वसामान्य नागरिक व छोट्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देणारे मनपा आयुक्त अभिजीत बांगर व पोलीस आयुक्त बी. के. सिंह बाजार समितीमधील नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करत नाहीत. यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. नियम न पाळणारांचे गाळे सील करण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस