शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे पनवेलमधील नद्या झाल्या स्वच्छ; जलचर प्राण्यांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:25 IST

किनारी भागातील पिकांसाठीही पाण्याचा उपयोग

कळंबोली : गेल्या अनेक दशकांपासून रसायनमिश्रित पाणी, गटाराचे सांडपाणी, मैलायुक्त पाणी, औद्योगिक वसाहतींचे प्रदूषित पाणी त्याचबरोबर शहरातला कचरा, जैविक कचरा अशा अनेक दूषित घटकांना आपल्यात सामावून घेणाऱ्या कासाडी, काळुंदे, गाढी आणि पाताळगंगा नदीचे पात्र लॉकडाउनमुळे स्वच्छ झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र पनवेल परिसरातील चारही नद्या या काळात निर्मळ झाल्या आहेत. नदी पात्राचे एक प्रकारे शुद्धीकरणच झाले आहे. नद्या प्रदूषणमुक्त झाल्याने जलचर प्राण्यांनाही जीवदान मिळाले आहे.

पनवेल तालुक्यातून गाढी, कासाडी, काळुंद्रे, पाताळगंगा अशा चार नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची मानली जाते. माथेरानच्या डोंगरातून उगम पावणाºया या नदीकिनारी ग्रामीण तसेच शहरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. इतरही जोडनद्या गाढी नदीतूनच तयार झाल्या आहेत. कासाडी नदी औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषित झाली आहे. शिरवलीच्या डोंगरातून उगम पावून तळोजा एमआयडीसी परिसरातून वाहत खाडीला मिळते. या नदीकिनारी काही कारखाने आहेत. अनेक कंपन्यांमधून नदीपात्रात रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे मासे तसेच इतर जलचर प्राणी मृत पावत आहेत. नदीपासून दोन किलोमीटरच्या परिसरात उग्र वास येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

काळुंद्रे व गाढी नदीतही कचरा, सांडपाणी, डेब्रिज, प्लास्टिक कचरा सर्रास टाकला जातो. दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरते. याशिवाय डोळे चुरचुरणे, डोके दुखणे, दमा, अस्थमा, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांनी अनेक नागरिक त्रस्त होतात. मात्र लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखाने बंद असल्याने प्रदूषण घटले आहे. परिणामी रसायनमिश्रित सांडपाणी, कचरा नदीपात्रात मिसळणे बंद झाले आहे. त्यामुळे या चारही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. नदी पात्रातील काळपटपणा, उग्र वास पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यामुळे हे पाणी नदीकिनारी पिकासाठी उपयुक्त ठरत आहे.

पर्यावरणप्रेमींकडून स्वागत

गाढी तसेच कासाडी नदी वाचवण्याकरिता पर्यावरणपे्रमींकडून परिश्रम केले जातात. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साफसफाई केली जाते. नदी पात्रातील पाणी दूषित होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु यंदा लॉकडाउनमुळे नदी पात्रातील पाणी शुद्ध झाले आहे. लॉकडाउननंतरही पाणी स्वच्छ, साफ राहील यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावेत, असे मत पर्यावरणप्रेमी संतोष चिखलकर यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याriverनदीNavi Mumbaiनवी मुंबई