शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
5
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
6
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
7
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
8
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
9
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
10
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
11
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
12
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
13
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
14
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
15
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
16
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
17
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
18
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
19
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
20
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल

सहा महिन्यांपासून तुर्भे परिसरात अनियमित पाणी, स्थायी समितीत उमटले पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:39 IST

नवी मुंबई : तुर्भे भागात एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची ...

नवी मुंबई : तुर्भे भागात एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, नागरिक हैराण झाले आहेत. बुधवार, ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत पाणी विषयावरून चर्चा सुरू असताना महापालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले.सीबीडी सेक्टर १ येथील पाणीपुरवठा पंपहाउस येथे २२ किलव्हॅट वीजवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने सद्यस्थितीतील वीजवाहिनी बदलून ११ किलव्हॅट करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत चर्चेसाठी आला होता, त्यावर चर्चा करताना नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी वाशी सेक्टर ३ व सेक्टर ४ मधील महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांना गळती लागल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून देत, यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून प्रश्नाकडे पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनी विद्युत विभागाने गेल्या सहा महिन्यांत तीन वेळा दुरु स्तीची कामे काढली आहेत, तरीदेखील चढवावरील भागात पाणी येत नसल्याचे सांगत इलेक्ट्रिक पंप, पॅनल ना दुरु स्त असल्याचे सांगत, वॉटर रिस्टोर व्हायला वेळ का लागतो? असा प्रशासनाला सवाल केला. स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी झोपडपट्टी भागातदेखील पाण्याच्या खूप समस्या असून नागरिक घेराव घालत असल्याचे सांगितले.२० वर्षे जुन्या लाइन असून चढावावरील भागात पाणी चढत नसल्याचे सांगत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होताना शटडाउनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. तुर्भे भागातील नागरिकांना मोरबेचे पाणी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक शिवराम पाटील यांनी काही ठिकाणी पाणी ओव्हरफ्लो होईपर्यंत पाणीपुरवठा केला जातो, तर गरीब नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप केला. तसेच २४ तास पाणी नको दिवसातून दोन तास पाणी द्या, अशी मागणी केली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी सदस्यांच्या भावना आयुक्तांना सांगणार असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.तुर्भेमधील नागरिक करणार आंदोलनएमआयडीसीतर्फे तुर्भे भागाला पाणीपुरवठा केला जातो; परंतु शटडाउन आणि इतर कारणांमुळे पाणीपुरवठा होण्यास अनेक अडथळे येत असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या विषयाचे गांभीर्य प्रशासनाने लक्षात घेऊन काही दिवसांत पाण्याची समस्या दूर करावी अन्यथा तुर्भेमधील प्रभाग क्र मांक ६८, ६९, ७० आणि प्रभाग क्र मांक ७३ मधील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई