शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

सहा महिन्यांपासून तुर्भे परिसरात अनियमित पाणी, स्थायी समितीत उमटले पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 03:39 IST

नवी मुंबई : तुर्भे भागात एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची ...

नवी मुंबई : तुर्भे भागात एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या सहा महिन्यांपासून वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असून, नागरिक हैराण झाले आहेत. बुधवार, ६ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत पाणी विषयावरून चर्चा सुरू असताना महापालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला धारेवर धरले.सीबीडी सेक्टर १ येथील पाणीपुरवठा पंपहाउस येथे २२ किलव्हॅट वीजवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने सद्यस्थितीतील वीजवाहिनी बदलून ११ किलव्हॅट करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती सभेत चर्चेसाठी आला होता, त्यावर चर्चा करताना नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी वाशी सेक्टर ३ व सेक्टर ४ मधील महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांना गळती लागल्याचे प्रशासनाच्या लक्षात आणून देत, यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांपासून प्रश्नाकडे पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसेवक देवीदास हांडे-पाटील यांनी विद्युत विभागाने गेल्या सहा महिन्यांत तीन वेळा दुरु स्तीची कामे काढली आहेत, तरीदेखील चढवावरील भागात पाणी येत नसल्याचे सांगत इलेक्ट्रिक पंप, पॅनल ना दुरु स्त असल्याचे सांगत, वॉटर रिस्टोर व्हायला वेळ का लागतो? असा प्रशासनाला सवाल केला. स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी यांनी झोपडपट्टी भागातदेखील पाण्याच्या खूप समस्या असून नागरिक घेराव घालत असल्याचे सांगितले.२० वर्षे जुन्या लाइन असून चढावावरील भागात पाणी चढत नसल्याचे सांगत एमआयडीसीकडून पाणीपुरवठा होताना शटडाउनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. तुर्भे भागातील नागरिकांना मोरबेचे पाणी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक शिवराम पाटील यांनी काही ठिकाणी पाणी ओव्हरफ्लो होईपर्यंत पाणीपुरवठा केला जातो, तर गरीब नागरिकांना पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप केला. तसेच २४ तास पाणी नको दिवसातून दोन तास पाणी द्या, अशी मागणी केली. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी सदस्यांच्या भावना आयुक्तांना सांगणार असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.तुर्भेमधील नागरिक करणार आंदोलनएमआयडीसीतर्फे तुर्भे भागाला पाणीपुरवठा केला जातो; परंतु शटडाउन आणि इतर कारणांमुळे पाणीपुरवठा होण्यास अनेक अडथळे येत असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या विषयाचे गांभीर्य प्रशासनाने लक्षात घेऊन काही दिवसांत पाण्याची समस्या दूर करावी अन्यथा तुर्भेमधील प्रभाग क्र मांक ६८, ६९, ७० आणि प्रभाग क्र मांक ७३ मधील नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई