शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

उघड्यावर मालवाहतुकीमुळे अपघातांना निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 5:27 AM

शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : शहरातून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. दगड, माती, विटा तसेच रेती यांची बंदिस्त वाहनातून वाहतूक होणे आवश्यक आहे. मात्र उघड्या डम्परमधून सर्रास वाहतूक होत असतानाही त्यावर कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.सायन-पनवेल मार्गावर मागील काही दिवसांपासून मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या संख्येत कमालीची भर पडली आहे. या वाहनांमधून उलवे अथवा लगतच्या परिसरातून मुंबईच्या दिशेने दगड, खडी, माती, वाळू तसेच विटा नेल्या जातात. मात्र बांधकामासाठी लागणाºया या मालाची वाहतूक करताना संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. यामुळे सायन- पनवेल मार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत असून जागोजागी मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. त्यात सर्वाधिक धोका दुचाकीस्वारांना निर्माण होत आहे. माती, रेती अथवा दगड यांची वाहतूक बंदिस्त वाहनातून अथवा त्यावर आवरण टाकून करणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नसल्याचे सायन-पनवेल मार्गावर दिसून येत आहे. मालवाहतूक करणारे हे डम्पर निष्काळजीपणे अती वेगात पळवले जात असल्याने अपघातांचा धोका निर्माण होत आहे.सायन-पनवेल मार्गाची अनेकदा डागडुजी झाल्याने ठिकठिकाणी चढ-उतार तयार झाले आहेत. त्याठिकाणी भरधाव डम्पर आपटून त्यामधील खडी, रेती उडून रस्त्यावर जागोजागी सांडत आहे. यामुळे मार्गालगत सर्वत्र रेतीचे थर साचलेले दिसतात. शिवाय डम्परमधून उडणाºया खडी अथवा मातीमुळे पाठीमागून येणाºया दुचाकीस्वारांच्या डोळ्यात धूळफेक होते. याच प्रकारामुळे शहरातील धूलिकणांमध्ये वाढ होत असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. मात्र उघड्या डम्परमधून दगडांची वाहतूक होत असताना, एखादा दगड उडून रस्त्यावर पडल्यास पाठीमागून येणाºया वाहनांचा गंभीर अपघात घडू शकतो.बहुतांश डम्परमध्ये उघड्यावर मालवाहतूक करण्यास त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरला जातो. या अवस्थेत डम्पर वेगात पळवले जात असल्याने रस्त्यांची जलद गतीने झीज होत आहे. त्याच कारणाने पामबीच मार्गावर डम्परसारख्या जड वाहनांना पालिकेने बंदी घातलेली आहे. यानंतरही रहदारीच्या दृष्टीने शहरातील महत्त्वाच्या मार्गावर नियमांची पायमल्ली करून उघड्यावर मालवाहतूक करणाºया डम्पर चालकांवर कारवाई होत नसल्याने वाहतूक पोलिसांसह आरटीओच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे.नवी मुंबईतून मुंबईकडे बांधकाम साहित्याची वाहतूक करताना संबंधित ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना पनवेल, नवी मुंबई व मुंबई आरटीओच्या कार्यक्षेत्रातून जावे लागते. त्यामुळे ओव्हरलोड मालवाहतूक तसेच उघड्यावर मालवाहतूक करणाºया डम्पर चालकांवर तीनपैकी एकातरी ठिकाणी कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र तसे होत नसल्याने तिथल्या संपूर्ण यंत्रणेच्याच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.तीन दिवसांपूर्वी एनआरआय पोलीस ठाण्यात एका डम्पर चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्या डम्परमध्ये क्षमतेपेक्षा सुमारे १४ हजार किलो जास्त माल भरलेला होता. शिवाय माल बंदिस्त न करताच त्याची वाहतूक केली जात होती. अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य राहिल्यास बांधकामाच्या साहित्याच्या वाहतुकीला शिस्त लागू शकेल. मात्र किल्ले जंक्शन येथूनच मोठ्या प्रमाणात इतरही डम्परमधून उघड्यावर मालाची वाहतूक होत असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मुंबई परिसरात कोट्यवधीची विकासकामे सुरू असून त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य नवी मुंबईच्या पनवेल, उलवे परिसरातून नेले जाते. त्याकरिता मुंबईला जोडणारा सायन-पनवेल एकमेव मार्ग असल्याने दिवस-रात्र जड अवजड वाहनांची रहदारी सुरू असते. मात्र अनेकदा मुंबईत जड वाहनांना निश्चित वेळीच प्रवेश दिला जातो. त्यामुळे वाशी टोलनाक्यापूर्वी अथवा सानपाडा, उरण फाटा यासह ठिकठिकाणी रस्त्यालगत कित्येक तास उभी केली जातात. यामुळे रहदारीला अडथळा होऊन अपघाताची शक्यता निर्माण होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातNavi Mumbaiनवी मुंबई