शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

नवी मुंबईत भाजपने नेमले घरातलेच निवडणूक प्रभारी; दोन्ही मतदारसंघात आमदारांच्या नातेवाईकांना पसंती

By नारायण जाधव | Updated: June 9, 2023 19:20 IST

भारतीय जनता पक्षाने लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे.

नवी मुंबई: भारतीय जनता पक्षाने लाेकसभा आणि विधानसभा निवडणुकीची आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रदेश भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मतदारसंघनिहाय निवडणूक प्रभारी नेमले आहेत. नवी मुंबईतील विधानसभेचे ऐरोली आणि बेलापूर असे मतदारसंघ आहेत. यात ऐरोलीतून गणेश नाईक तर बेलापूरमधून मंदा म्हात्रे या आमदार आहेत. एकाच पक्षाच्या या दोन्ही आमदारांतील मतभेद कमालीचे ताणलेले आहेत. अशातच दोन्ही मतदारसंघात प्रदेशाध्यक्षांनी जे प्रभारी नेमले आहेत, ते आमदारांच्या घरातील सदस्यच असल्याने कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यानुसार ऐरोलीतून गणेश नाईक यांचे पुतणे माजी महापौर सागर नाईक हे तर बेलापूर मतदारसंघातून मंदाताईंचे चिरंजीव माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविली आहे. दोन्ही आमदारांत मतभेद असल्याने कदाचित वाद नको म्हणून पक्षश्रेष्ठींनी घरातील व्यक्तींवरच जबाबदारी सोपविल्याचे सांगण्यात आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी समन्वयाचे काम प्रभावीपणे करू शकतील, अशा नेत्यांना प्रभारी म्हणून नेमले आहे. तेच उमेदवारदेखील असतील असे अजिबात नाही. प्रभारी व उमेदवार हे दोन वेगवेगळे विषय आहेत. उमेदवारीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे बावनकुळे यांनी राज्यभरातील प्रभारींची नियुक्ती करताना म्हटले आहे.

नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. शहर गणेश नाईक यांचा बालेकिल्ला असले तरी मंदाताईंनी दोनदा विजयश्री खेचून आणली आहे. शिवाय ओबीसींच्या आक्रमक महिला आमदार म्हणून त्या पक्षात लोकप्रिय आहेत. तर नवी मुंबईसारखे महत्त्वाचे शहर हातात ठेवायचे असेल, तर गणेश नाईक यांच्याशिवाय पर्याय नाही. हे पक्षश्रेष्ठी जाणून आहेत. यामुळे नाईक आणि म्हात्रे या घराण्याची नाराजी पक्षाला परवडणारी नाही, असे गृहीत धरून आपले ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे धोरण ठाणे खाडीत बुडवून भाजपने सागर नाईक यांच्यावर ऐरोली तर नीलेश म्हात्रेंवर बेलापूरची जबाबदारी सोपविली आहे.

जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीकडे लक्षदोन्ही प्रभारी आपले काका-आईच्या कामांविषयी सकारात्मक अहवाल देणार हे नक्की असून तेच आगामी आमदार असतील, अशी चर्चा आहे; परंतु, आता पक्षाच्या वतीने जिल्हाअध्यक्षांच्या नियुक्त्याही लवकरच जाहीर होणार आहेत. त्यात कोणाच्या समर्थकाला श्रेष्ठी प्राधान्य देतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

संजीव नाईक कळवा-मुंब्राचे प्रभारीठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक यांच्यावर राष्ट्रवादीचे आक्रमक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे. संजीव हे ठाण्याचे माजी खासदार असले तरी या मतदारसंघात गणेश नाईक यांना मानणारा मोठा वर्ग आहे. नाईक हे जुन्या बेलापूर मतदारसंघाचे आमदार असताना कळव्यातील आगरी आणि मुंब्य्रातील मुस्लीम मतदारांत ते लोकप्रिय आहेत. कारण जुन्या बेलापूर मतदारसंघात नवी मुंबईसह कळवा-मुंब्रा, ठाण्याचा बाळकूम-घोडबंदरपट्ट्यासह मीरा-भाईंदर शहराचा समावेश होता. आशिया खंडातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून त्याकाळी बेलापूरकडे पाहिले जात होते. भाजपची मुस्लीम मतदारांतील इमेज सावरण्यासाठी संजीव नाईक यांच्यावर कळवा-मुंब्रा मतदारसंघाची जबाबदारी सोपविल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBJPभाजपा