शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या भरभराटीतून बागायती शेती भुईसपाट

By admin | Updated: November 15, 2014 23:00 IST

कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत.

शौकत शेख ल्ल डहाणू
डहाणूपासून केवळ 25 कि. मी. अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव औद्योगिक वसाहतीतील वाढते उद्योग रोजगार निर्मितीसाठी पर्वणी ठरत असल्याने शिवाय कामगारांना येण्याजाण्यासाठी कारखानेदारांकडून घरपोच वाहन सुविधा असल्याने डहाणू तसेच तलासरी तालुक्यातील कुशल अकुशल पुरूष, महिला, रोजगार प्राप्तीसाठी गुजरात राज्यात जात आहेत. त्यामुळे या परिसरातील शेती बागायतीसाठी मजुरांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी उद्योगधंद्याची भरभराट होत असून शेती, बागायती व्यवसाय भुईसपाट होण्याची वेळ आली असल्याचे मत वाढवण येथील प्रगतशील शेतकरी प्रभाकर पाटील यांनी सांगितले.
डहाणू तालुका हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्याचे सांगुन केंद्र शासनाने सन 1991 ला या परिसरात उद्योगबंदी लादली. या उद्योगबंदीमुळे सुशिक्षितबेकार तरूणांना रोजगार मिळू शकत नाही. तर लघु उद्योगांना पुर्णत: बंदी असल्यामुळे मोलमजुरी करणा:या आदिवासी कामगारांच्या कुटूंबाची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे दरवर्षी रोजगारासाठी हजारो आदिवासी स्थलांतर करीत असत. परंतु गेल्या एक वर्षापासून डहाणूच्या सीमेवर असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगाव येथे कापड, पेन्सिल, पेन, होजियरी चे शेकडो कारखाने सुरू झाल्याने डहाणू, तलासरी, तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कामगार तेथे जाऊ लागले आहे. 
विशेष म्हणजे येथील कारखानदार कामगारांना येण्याजाण्यासाठी डहाणू, तलासरीसाठी वाहन उपलब्ध करून देत असल्याने शेती, बागायती, विटभट्टी तसेच बोटीत जाणारे मजुर दररोज उंबरगाव येथील कारखान्यात जाताना दिसत आहे. दररोज उंबरगाव येथून पंधरा ते वीस आरामबस डहाणूच्या विविध भागात महिला तसेच पुरूषांना कामावर घेऊन जात असल्याने या भागातील शेती, बागायती करणो हा चिंतेचा विषय बनू लागला आहे.
दरम्यान डहाणूच्या पश्चिम भागातील चिंचणी, वरोर, वाढवण, ओसार, तणासी, वानगांव, डेहणो, साखरे, आसनगांव, चंडिगाव, डहाणू इ. भागात मोठ मोठय़ा बागायती असून या परिसरात पावसाळ्यात शेती तर त्यानंतर मिरची, भोपली, वांगी, भेंडी, दुधीचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात या भागाचा पहिला नंबर आहे. दररोज येथून शेकडो टन भाजीपाला मुंबईच्या मुख्य बाजारपेठेत जात असतो. परंतु दिवसेंदिवस मजुर टंचाईमुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत.