शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तालयातील गुन्ह्यांचा वाढतोय आलेख

By admin | Updated: January 9, 2016 02:25 IST

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपोलीस आयुक्तालय क्षेत्रात २००४ पासून तब्बल २३,०४८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. गुन्ह्यांचा बॅकलॉग प्रतिवर्षी वाढतच चालला आहे. तपास लागलेल्या गुन्ह्यांचे श्रेय घेण्यासाठी अधिकारी धडपडत असतात. परंतु प्रलंबित गुन्ह्यांविषयी मात्र कोणीच काही बोलत नाही. आतापर्यंत १३७ खुनाचे गुन्हे व १२,१३४ चोरीच्या गुन्ह्यांचा तपासही प्रलंबित असून याप्रकरणी पीडित नागरिकांना न्याय कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेवून २०१५ या वर्षातील कामगिरीची माहिती दिली. गत १२ वर्षांमध्ये पहिल्यांदाच ६७ टक्के गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्षभरात ५४०५ गुन्ह्यांची नोंद झाली होती. यामधील ३६२० गुन्ह्यांचा तपास लागला असून तब्बल १७४८ गुन्हे प्रलंबित आहेत. प्रत्येक वर्षी गुन्ह्यांचा हा बॅकलॉग वाढत चालला आहे. पोलिसांच्या वार्षिक अहवालाप्रमाणे २००४ पासून शहरात विविध प्रकारचे ५६,५६५ गुन्हे घडले आहेत. यामधील ३३,५१७ गुन्ह्यांचाच तपास लागला आहे. अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना अपयश आले आहे. ऐरोलीतील काँगे्रसचे नगरसेवक अनंत काळे यांची जवळपास सात वर्षांपूर्वी ऐरोलीमध्ये हत्या झाली. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विश्वास पाटील, वाशीतील डेंटिस्ट महिला डॉक्टर, घणसोलीमधील एटीएममधील सुरक्षा रक्षकाचा खून, बेलापूरमधील पारसिक हिलवर विदेशी महिलेवर झालेला बलात्कार या प्रमुख गुन्ह्यांमधील आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. खुनाच्या १३७ गुन्ह्यांचा तपास शिल्लक असून त्यांचे आरोपी कोण हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात चोरी, घरफोडी, वाहनचोरी करणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी काही टोळ्यांना जेरबंद केले असले तरी प्रत्येक वर्षी या गुन्ह्यांमध्ये वाढच होत आहे. प्रत्येक वर्षी जवळपास ८० ते १०० कोटी रुपयांचे दागिने, रोख रक्कम व इतर वस्तूंची चोरी होत आहे. फक्त ३० ते ३५ टक्के चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. घरफोडी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढल्याने महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना वाढली आहे. चोरी गेलेले दागिने कधी परत मिळणार अशी विचारणा करण्यासाठी अनेक जण पोलीस स्टेशनमध्ये जातात. परंतु काहीही होत नसल्याचे लक्षात येताच पाठपुरावा करण्याचेही सोडून देत आहेत. १२ वर्षांमध्ये १६१४ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. घर घेण्याच्या व नोकरीच्या आमिषाने अनेकांना फसविले आहे. त्यांच्याकडून लाखो रुपये हडप करून आरोपी खुलेआम फिरत आहेत. ज्यांच्यावर कारवाई झाली तेही काही दिवसामध्ये जामिनावर सुटून बिनधास्तपणे समाजात उजळ माथ्याने फिरत असून पीडित नागरिक मात्र न्यायासाठी पोलीस स्टेशन व न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.नवी मुंबई स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. परंतु इतर शहरांप्रमाणे या परिसरातही महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. २००४ मध्ये ३० महिलांवर अतिप्रसंग झाल्याचे गुन्हे दाखल झाले होते. २०१५ मध्ये ही संख्या १०४ झाली आहे. विनयभंगाचे गुन्हे ३३ वरून २०२ झाले आहेत. या कालावधीमध्ये अतिप्रसंगाच्या २१ गुन्ह्यांचा व विनयभंगाच्या २५ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही. याशिवाय सोनसाखळी चोरी व महिलांविषयी इतर गुन्ह्यांचे प्रमाणही प्रचंड असून ते कमी करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.फसवणुकीचे गुन्हे रोखण्याचे आव्हान नवी मुंबई पोलिसांसमोर फसवणुकीचे गुन्हे थांबविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. घरे घेवून देण्याच्या बहाण्याने बिल्डर नागरिकांची फसवणूक करत आहेत. अनधिकृत इमारती उभ्या करून तेथील घरे अधिकृत असल्याचे भासवून फसवणूक केली जात आहे. १२ वर्षांपूर्वी फसवणुकीच्या १४२ घटना घडल्या होत्या. गतवर्षी ही संख्या तीन पटीने वाढून ५६३ झाली आहे. भविष्यात या गुन्ह्यांमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घरफोडीचे गुन्हे दुप्पटशहरात रात्री व दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाणही दुप्पट झाले आहे. २००४ मध्ये वर्षभरामध्ये ३१३ गुन्हे घडले होते, ते २०१५ ला ६१९ वर गेले आहेत. नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. घर बंद करून कामावर गेलेल्या नागरिकांना सायंकाळी येण्यापूर्वीच दरवाजा तोडून चोर दागिने व रोकड घेवून पळून जात आहेत. सुटीवर गेलेल्या नागरिकांना परत येईपर्यंत घर सुरक्षित राहील याची खात्री राहिलेली नाही.