शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

घणसोली-तळवली जुना पूल धोकादायक, अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 3:20 AM

घणसोली आणि तळवली गावाला जोडणारा ग्रामपंचायती काळातील पूल जीर्ण झाला आहे.

नवी मुंबई : घणसोली आणि तळवली गावाला जोडणारा ग्रामपंचायती काळातील पूल जीर्ण झाला आहे. ठिकठिकाणी तडे गेले आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराकडे महापालिकेने सपशेल दुर्लक्ष केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.घणसोली गाव, नोड आणि तळवलीला जोडणारा सध्या हा एकमेव पूल आहे. घणसोली ते ऐरोली पामबीच मार्गाचे काम खारफुटीमुळे रखडले आहे, त्यामुळे सध्या चार ते पाच कि.मी. लांबीच्या या एकमेव पुलाचा वापर होत आहे. हलक्या वाहनांसह अवजड वाहनेसुद्धा याच पुलावरून जा-ये करतात, त्यामुळे पुलाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्लॅब निखळले आहेत, भिंती मोडकळीस आल्या आहेत. अगदी जीर्ण अवस्थेत असलेल्या या पुलावरून रात्रंदिवस वाहतूक सुरू आहे, त्यामुळे दिवसेंदिवस हा पूल खचताना दिसत आहे. पुलाच्या भिंतीचे प्लॅस्टर कोसळल्याने गंजलेल्या व तुटलेल्या लोखंडी तारा स्पष्टपणे दिसत आहेत. कोणत्याही क्षणी हा पूल कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या पुलाच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने अलीकडेच निविदा काढल्याची माहिती स्थानिक नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी ‘लोकमत’ला दिली. दिवाळीपूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होईल. त्याचबरोबर येथील रस्त्याचेही डांबरीकरण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.>महापालिकेचे दुर्लक्षकोपरखैरणे मार्गाने घणसोली आणि पुढे तळवलीकडे जाण्यासाठी हा एकमेव जुना पूल आहे, त्यामुळे बहुतांशी वाहनधारक याच पुलाचा वापर करतात. विशेष म्हणजे, या पुलापर्यंत जाणारा रस्ताही कच्चा आहे. मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याचे कामही रखडले आहे. त्यावर दिवाबत्तीची सुविधा नाही, त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनधारकांची कसरत होत आहे. या प्रकाराकडे महापालिकेने सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. पुलाची नियमित डागडुजी केल्यास घणसोली आणि तळवलीला जोडणारा हा एक कायमस्वरूपी पर्याय होऊ शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.>हा पूल पुढे खाडीला मिळतो; परंतु पुलाखालून वाहणाऱ्या नाल्यात मोठ्या प्रमाणात घनकचरा साचला आहे, तसेच त्यात मेलेली कुत्री, डुकरे टाकून दिली आहेत, तसेच या घाणीत उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.