शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

चौदा हजार ५०० गावे झाली दुष्काळमुक्त, उरण शहराच्या ५६ कोटी खर्चाच्या कामांचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 5:52 AM

उरण : भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन अधिक धोकादायक असल्याचे सांगतानाच, १४ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावा राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उरण येथे केला.

उरण : भारतासाठी पाकिस्तानपेक्षा चीन अधिक धोकादायक असल्याचे सांगतानाच, १४ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावा राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उरण येथे केला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण निधीतून उरण शहरात करण्यात येणाºया ५६ कोटी खर्चाच्या विकासकामे योजनेचा शुभारंभ शुक्रवारी त्यांच्या हस्ते झाला.उरण नगरपरिषदेच्या टाउन हॉल इमारतीचे अद्ययावत बांधकाम, शहरातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, विमला तलाव आणि उद्यानाचे सुशोभीकरण आदी विकासकामांची योजना आखण्यात आली होती. यासाठी लागणारा निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागामार्फत मंजूर केला आहे. माजी नगराध्यक्ष महेश बालदी यांच्या प्रयत्नानंतर, या कामांसाठी लागणारा ५६ कोटींचा निधी उरण शहराच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उपलब्ध करून दिला आहे. या विविध विकासकामांच्या योजनांचा शुभारंभ शुक्रवारी राज्याचे बंदरे, वैद्यकीय, माहिती, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या वेळी चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. ‘जलयुक्त शिवार’ योजनेतून २७ हजार ५०० दुष्काळग्रस्त गावांपैकी १४ हजार ५०० गावे भाजपा सरकारने दुष्काळमुक्त केली असल्याचा दावाही त्यांनी केला.या वेळी एलिफंटा बेटावर वीज आणणार असून, त्याचे उद्घाटनही मुख्यमंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्याचा मानस बालदी यांनी व्यक्त केला. करंजा बंदरासाठी १५० कोटी निधीपैकी जेएनपीटीच्या सागरमाला योजनेतून ७५ कोटी, तर शासनाकडून ७५ कोटी निधी मिळणार आहे. करंजा रो रो सेवा सुरू करायची असून, शहरातील अंडरग्राउंड केबल्ससाठी ४० कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचेही बालदी म्हणाले.>सेनेची कार्यक्रमाकडे पाठउरण नगरपरिषदेत भाजपाची सत्ता असली, तरी उनपमध्ये सेनेचे पाच नगरसेवक आहेत. सेनेच्या एकाही नगरसेवकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले नव्हते. यामुळे नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असल्याची माहिती सेनेचे गटनेते गणेश शिंदे यांनी दिली. सर्वांना निमंत्रण देण्याचे काम प्रशासनाकडे सोपविण्यात आले होते. त्यांनी ते केले की नाही, हे तपासून पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक प्रवक्ते कौशिक शहा यांनी दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेनेचे आ. मनोहर भोईर कार्यक्रमाला आले नाहीत.