नवी मुंबईत केमिकल कंपन्यांमध्ये अग्नितांडव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 09:00 IST2018-04-25T08:49:38+5:302018-04-25T09:00:18+5:30
ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आलमा, वैष्णवी व नारलबस कंपन्यांना भीषण आग लागली आहे.

नवी मुंबईत केमिकल कंपन्यांमध्ये अग्नितांडव
नवी मुंबई - ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील आलमा, वैष्णवी व नारलबस कंपन्यांना भीषण आग लागली आहे. मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग विझवण्यासाठी वाशी, ऐरोली, सीबीडीसह पनवेल अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. तर तीन कामगार जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एकाच वेळी 5 कंपन्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुंबई व ठाण्याहून देखील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावण्यात आल्या होत्या.