शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

केंद्राच्या निधीअभावी रखडले नाला व्हिजन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 4:24 AM

जेएनएनयूआरएम अंतर्गत नाला व्हिजन राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी ७४ किलोमीटर लांबीच्या २९ नाल्यांची सुधारणा, साफसफाई व संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठविला होता.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - जेएनएनयूआरएम अंतर्गत नाला व्हिजन राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी ७४ किलोमीटर लांबीच्या २९ नाल्यांची सुधारणा, साफसफाई व संरक्षण भिंत बांधण्याचा प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठविला होता. दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतरही तो प्रस्ताव मंजूर न झाल्यामुळे नाला व्हिजन रखडले असून, ही कामे करण्यासाठी पालिकेला तब्बल ७०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.केंद्र शासनाने २००५ मध्ये दहा लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील नागरी सुविधांसाठी जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (जेएनएनयूआरएम) सुरू केली. नवी मुंबई महानगरपालिकेनेही या योजनेमधून जास्तीत जास्त निधी शहराला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पाणीपुरवठा, मलनि:सारण व परिवहनमध्ये बस खरेदी ही कामे या योजनेअंतर्गत करण्यात आली. पालिकेने पाठविलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये नाला व्हिजनचाही समावेश आहे. महापालिका कार्यक्षेत्रामधील सद्यस्थितीमध्ये सर्वात गंभीर विषय आहे. डोंगरावरून खाडीकडे पावसाचे पाणी घेऊन जाणारे २० नाले शहरामध्ये आहेत. या नाल्यांची एकूण लांबी ७४ किलोमीटर एवढी आहे. काही नाल्यांची लांबी ४०० मीटर तर काहींची तब्बल ७ किलोमीटर एवढी आहे. नाल्यांची साफसफाई केली जात नसल्यामुळे त्यामध्ये गाळ साचला आहे. दगड अस्ताव्यस्त स्वरूपात नाल्यात पडले आहेत. डेब्रिज माफियांनी बांधकामांचा कचरा टाकून नाल्यांचा आकार कमी करण्यास सुरुवात केली आहे. दिघा ते शिरवणेपर्यंत नाल्याच्या बाजूला झोपड्यांचे बांधकाम झाले आहे. पावसाचे पाणी झोपड्यांमध्ये जाऊन यापूर्वी जीवितहानीही झाली आहे. भविष्यातही अशाप्रकारच्या घटना घडण्याची शक्यता आहे.दिघा, ऐरोली, इंदिरानगर व इतर अनेक ठिकाणी नैसर्गिक नाल्यांना संरक्षण भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. नगरसेवकांनीही सभागृहामध्ये याविषयी आवाज उठविला आहे. परंतु दहा वर्षांपासून जेएनएनयूआरएम अंतर्गत नाला व्हिजन राबविले जाणार असल्याचे आश्वासन प्रशासनाकडून दिले जात होते. केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असून, हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कामे केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. शहरासाठी महत्त्वाच्या या प्रकल्पासाठी प्रशासनासह दहा वर्षांतील खासदारांनीही पाठपुरावा केला होता; परंतु हा प्रस्ताव मान्य झाला नाही. लोकप्रतिनिधीही केंद्राकडून निधी आणण्यात अपयशी ठरले. यामुळे भविष्यात पालिकेला स्वखर्चाने ही कामे करावी लागणार आहेत. शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करणे, नाल्यांचे पात्र पूर्ववत करणे व इतर कामे करण्यासाठी तब्बल ७०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. भविष्यात केंद्राचा निधी यासाठी मिळविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. निवडणुकीमही उमेदवार त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा विषय घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जाहीरनाम्यात येणार का नाला व्हिजनलोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून शहरवासीयांना प्रश्न सोडविण्याची आश्वासने दिली जात आहेत. निवडणुकीमध्ये उमेदवार त्यांचे जाहीरनामेही प्रसिद्ध करतात. नवी मुंबईमधील नैसर्गिक नाल्यांची सुधारणा करण्याचा विषय जाहीरनाम्यात घेतला जावा, अशी अपेक्षा शहरवासीयांनी केली आहे.शहरामधील नाल्यांची सद्यस्थितीनाल्यांमध्ये गाळ साचला असून, दगडांमुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत आहेत.बोनसरी व दिघा परिसरामध्ये पावसाचे पाणी नागरी वस्तीमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.नाल्यांमध्ये डेब्रिज व इतर कचरा टाकला जात आहे.नाल्यांच्या काटावर झोपड्या व इतर बांधकामे झाली आहेत.विकासासाठी अनेक ठिकाणी नाल्यांचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई