शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

माथेरानला जलदुष्काळाच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 11:54 PM

जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; नागरिक संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत :  पाणी हेच जीवन हे फक्त कागदावरच राहिले आहे. गेली पाच दिवस एमजेपीकडून माथेरानकरांना मुबलक प्रमाणात पाणी असूनही मिळत नसल्याने माथेरानकर पुरते हवालदिल झाले आहेत. पाणी असूनही दुष्काळाची स्थिती माथेरानमध्ये झाली असून जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे.

माथेरानला शार्लोट तलाव व नेरळ कुंभे येथून पाणीपुरवठा होतो. नेरळ कुंभे येथून पाणीपुरवठा बंद आहे तर शारलेट तलावामधून होणारा पुरवठा विजेचे कारण पुढे करत चालढकल होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. स्थानिकांसह दुकानदार पाणी नसल्याने हवालदिल झाले आहेत. काही दुकानदारांनी पाणी नसल्याने दुकाने बंद केली आहेत. तर महिलांकडून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.माझे रेस्टॉरंट आहे. या रेस्टॉरंटमध्ये गेली पाच दिवस पाणी आले नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी जीवन प्राधिकरणच्या माथेरान कार्यालयात गेलो असता कोणीही अधिकारी येथे हजर नव्हता. आम्हाला पाणी हे वाणिज्य दराने मिळते. असे असताना पाणी मिळत नसताना देखील आम्ही बिल का भरावे? अशी तक्रार स्थानिक रेस्टॉरंट मालक अरविंद शेलार यांची आहे.

नेरळहून जुम्मापट्टी, जुम्मापट्टी ते वॉटर पाईप आणि वॉटर पाईप ते माथेरान असे तीन टप्यात पंप आहेत. त्यातील पंप नादुरुस्त झाले. ते दुरुस्त करून आणले आहेत. बुधवारपासून पाणी सुरळीत देण्याचा आमचा प्रयत्न राहील.- पांडुरंग पाटील, शाखा अभियंता

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMatheranमाथेरान