शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
8
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
9
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
10
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
11
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
12
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
13
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
14
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
15
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
16
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
17
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
18
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
19
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...

सिडकोचे स्वप्न साकार करणाऱ्यांची ओंजळ रिकामी

By admin | Updated: January 13, 2017 06:18 IST

दगडावर घणाघाती प्रहार करून सिडकोला शहर निर्मितीसाठी मदत करणाऱ्या दगडखाण

अलिबाग : दगडावर घणाघाती प्रहार करून सिडकोला शहर निर्मितीसाठी मदत करणाऱ्या दगडखाण कामगारांची ओंजळ पिण्याच्या पाण्यावाचून रिकामीच आहे. गेल्या २५ वर्षांपासून पनवेल तालुक्यातील उलेवे-सिद्धार्थनगरमध्ये अशीच परिस्थिती असल्याने त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पाण्यासाठीची भटकंती थांबावी आणि कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन सिद्धार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटनेने गुरुवारी जिल्हा प्रशासनाला दिले.नवी मुंबईचा विकास ज्या पायावर उभा आहे. त्या पायाचा दगड हा पनवेल तालुक्यातील उलवे येथील सिद्धार्थनगर परिसरातील दगडखाण कामगारांनी फोडला आहे. त्यांच्या मेहनतीच्या बळावरच सिडकोने नवी मुंबईची निर्मितीचे स्वप्न सत्यात उतरविले. दगडखाणीत काम करणारे काही कामगार अशिक्षित आहेत. येथील सर्व्हेे नंबर ५१ मध्ये त्यांची गेल्या २५ वर्षांपासून घरे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. सिद्धार्थनगरमध्ये ५०० नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अद्यापही सोय नाही. तेथील रहिवाशांकडे रेशन कार्ड, आधार कार्ड आहे, तसेच घटनेने दिलेला मतदानाचा हक्कही येथील नागरिक बजावतात, असे सिद्धार्थनगर गणेशपुरी रहिवासी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, यांच्यासह स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले आहे.प्रशासनाने पाण्याची व्यवस्था करावी२१ व्या शतकातही दलितांच्या, कष्टकऱ्यांच्या वस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी फिरावे लागते. हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्यायच आहे. पाणी नाकारणे हा विषय अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत येतो, तसेच हे कृत्य घटनाबाह्य आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.अशी मागणी संघटनेचे सल्लागार राजाराम पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. येथील नागरिक हे कित्येक वर्षे संघटित नव्हते. त्यामुळे त्यांना आपल्या हक्काची जाणीव नव्हती. आता ते संघटित झाले आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असेही पाटील यांंनी स्पष्ट केले.500 नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अद्यापही सोय नाही. सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या गणेशपुरी येथून पायपीट करून त्यांना पाणी आणावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांची ही पायपीट रोजचीच झाली आहे.150 नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अद्यापही सोय नाही. पाण्याची व्यवस्था करावी यासाठी आ. प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह स्थानिक ांनी निवेदन दिले आहे.