शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

‘जैत रे जैत’ चे भयाण वास्तव

By admin | Updated: October 7, 2016 05:45 IST

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही चित्रपट व त्यामधील

नामदेव मोरे / नवी मुंबईमराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही चित्रपट व त्यामधील गाण्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण ज्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनविण्यात आला ते आदिवासी मात्र अद्याप दारिद्र्याशीच झुंज देत आहेत. रानसई व कर्नाळा परिसरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी ठाकर समाजाकडे सर्वप्रथम लक्ष वेधले ते प्रसिद्ध कादंबरीकार गो. नी. दांडेकर यांनी. १९६५मध्ये त्यांची ‘जैत रे जैत’ कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीला मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आदिवासी ठाकर समाजाचे जीवन सर्वांसमोर आले. कादंबरीचा नायक नाग्या ठाकूर व चिंधीही लोकप्रिय झाली. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी डॉ. जब्बार पटेल यांना या कादंबरीमध्ये संगीतमय चित्रपटासाठीचा दमदार मसाला असल्याचे सांगितले. जब्बार पटेल यांनी कादंबरी वाचली व नाग्या व चिंधीच्या प्रेमकथेने त्यांच्या मनावरही गारूड केले आणि ‘जैत रे जैत’ चित्रपट तयार झाला. १९७७ मध्ये चित्रपट प्रसिद्ध झाला व त्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवा विक्रम केला. या चित्रपटाने स्मिता पाटील,डॉ. मोहन आगाशे, निळू फुले, सुलभा देशपांडे यांच्या अभिनयाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी प्रथमच चित्रपटासाठी गीतलेखन केले. त्यांनी शब्दबद्ध केलेली जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली, आम्ही ठाकर ठाकर, नभं उतरू आलं, डोंगर काठाडी ठाकरवाडी ही गीते अजरामर झाली. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये ‘जैत रे जैत’ चा उल्लेख सुवर्णाक्षरांनी झाला. चित्रपट प्रसिद्ध होवून ४० वर्षे झाली तरी त्याची व त्यामधील गीतांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटासाठी स्मिता पाटील यांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘जैत रे जैत’च्या निर्मितीमध्ये सहभाग असलेले कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वांना फायदा झाला परंतु ज्या आदिवासींच्या जीवनावर हा चित्रपट बनविण्यात आला त्या आदिवासी ठाकर समाजबांधवांची परिस्थिती अद्याप जैसे थे आहे. ४० वर्षांपूर्वीही आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते व आताही ते दारिद्र्याशीच झुंज देत आहेत. तेव्हाही आदिवासी वाड्यांवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. शिक्षण, वैद्यकीय सुविधा, पाणी, उदरनिर्वाहाचे साधन काहीही नव्हते. आताही तीच स्थिती आहे. पावसाळ्यात भाजीपाला पिकवायचा. उन्हाळ्यात मध गोळा करायचा. रानमेवा विकून उदरनिर्वाह करायचा हे सर्व तसेच्या तसेच आहे. ‘जैत रे जैत’ चित्रपटाचा विसर कधीच कोणाला पडणार नाही. पण बिचाऱ्या ठाकर समाजाच्या समस्या सोडविण्याचा विसर मात्र सर्वांनाच पडला आहे. चित्रपटाचा नायक जिंकूनही हरतो, तसेच आदिवासीही परिस्थितीपुढे हरले आहेत.

50 वर्षांत काहीच बदल नाही-गो. नी. दांडेकर यांनी १९६५ मध्ये ‘जैत रे जैत’ कादंबरी लिहिली. डॉ. जब्बार पटेल यांनी १९७८ मध्ये चित्रपट प्रसिद्ध केला. कादंबरी लिहून ५० व चित्रपट प्रसिद्ध होवून ४० वर्षे झाली. या कालावधीमध्ये देशभर प्रचंड राजकीय, सामाजिक,आर्थिक बदल झाले. पण आदिवासींच्या जीवनामध्ये मात्र काहीच बदल झालेले नाहीत. त्यांच्या समस्या तेव्हा होत्या त्यापेक्षा वाढल्या आहेत. आजही ते गरीबच असून त्यांचे जीवन चित्रपटाच्या नायकाप्रमाणे एक जिवंत शोकांतिका बनले आहे.

चित्रपट सृष्टीलाही विसर-च्‘जैत रे जैत’ च्या चित्रीकरणासाठी मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीमधील दिग्गज कलाकार जवळपास तीन महिने कर्नाळा परिसरात होते. चित्रपटातील एक गीत रानसई गावामध्ये चित्रित करण्यात आले. च्पायथ्याला असलेल्या कल्ले गावासह कर्नाळा किल्ला व परिसरात सर्व चित्रीकरण झाले. प्रचंड यश मिळाल्यानंतर चित्रपट सृष्टी येथील आदिवासींना विसरून गेली. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी काहीच प्रयत्न केले नाहीत.