शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

‘जैत रे जैत’ चे भयाण वास्तव

By admin | Updated: October 7, 2016 05:45 IST

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही चित्रपट व त्यामधील

नामदेव मोरे / नवी मुंबईमराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही चित्रपट व त्यामधील गाण्यांची लोकप्रियता कमी झालेली नाही. चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली पण ज्यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बनविण्यात आला ते आदिवासी मात्र अद्याप दारिद्र्याशीच झुंज देत आहेत. रानसई व कर्नाळा परिसरामध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासी ठाकर समाजाकडे सर्वप्रथम लक्ष वेधले ते प्रसिद्ध कादंबरीकार गो. नी. दांडेकर यांनी. १९६५मध्ये त्यांची ‘जैत रे जैत’ कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीला मराठी वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. आदिवासी ठाकर समाजाचे जीवन सर्वांसमोर आले. कादंबरीचा नायक नाग्या ठाकूर व चिंधीही लोकप्रिय झाली. संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी डॉ. जब्बार पटेल यांना या कादंबरीमध्ये संगीतमय चित्रपटासाठीचा दमदार मसाला असल्याचे सांगितले. जब्बार पटेल यांनी कादंबरी वाचली व नाग्या व चिंधीच्या प्रेमकथेने त्यांच्या मनावरही गारूड केले आणि ‘जैत रे जैत’ चित्रपट तयार झाला. १९७७ मध्ये चित्रपट प्रसिद्ध झाला व त्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नवा विक्रम केला. या चित्रपटाने स्मिता पाटील,डॉ. मोहन आगाशे, निळू फुले, सुलभा देशपांडे यांच्या अभिनयाला वेगळी उंची प्राप्त करून दिली. निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी प्रथमच चित्रपटासाठी गीतलेखन केले. त्यांनी शब्दबद्ध केलेली जांभूळ पिकल्या झाडाखाली, मी रात टाकली, आम्ही ठाकर ठाकर, नभं उतरू आलं, डोंगर काठाडी ठाकरवाडी ही गीते अजरामर झाली. मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासामध्ये ‘जैत रे जैत’ चा उल्लेख सुवर्णाक्षरांनी झाला. चित्रपट प्रसिद्ध होवून ४० वर्षे झाली तरी त्याची व त्यामधील गीतांची लोकप्रियता कमी झालेली नाही. या चित्रपटासाठी स्मिता पाटील यांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘जैत रे जैत’च्या निर्मितीमध्ये सहभाग असलेले कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वांना फायदा झाला परंतु ज्या आदिवासींच्या जीवनावर हा चित्रपट बनविण्यात आला त्या आदिवासी ठाकर समाजबांधवांची परिस्थिती अद्याप जैसे थे आहे. ४० वर्षांपूर्वीही आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल होते व आताही ते दारिद्र्याशीच झुंज देत आहेत. तेव्हाही आदिवासी वाड्यांवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. शिक्षण, वैद्यकीय सुविधा, पाणी, उदरनिर्वाहाचे साधन काहीही नव्हते. आताही तीच स्थिती आहे. पावसाळ्यात भाजीपाला पिकवायचा. उन्हाळ्यात मध गोळा करायचा. रानमेवा विकून उदरनिर्वाह करायचा हे सर्व तसेच्या तसेच आहे. ‘जैत रे जैत’ चित्रपटाचा विसर कधीच कोणाला पडणार नाही. पण बिचाऱ्या ठाकर समाजाच्या समस्या सोडविण्याचा विसर मात्र सर्वांनाच पडला आहे. चित्रपटाचा नायक जिंकूनही हरतो, तसेच आदिवासीही परिस्थितीपुढे हरले आहेत.

50 वर्षांत काहीच बदल नाही-गो. नी. दांडेकर यांनी १९६५ मध्ये ‘जैत रे जैत’ कादंबरी लिहिली. डॉ. जब्बार पटेल यांनी १९७८ मध्ये चित्रपट प्रसिद्ध केला. कादंबरी लिहून ५० व चित्रपट प्रसिद्ध होवून ४० वर्षे झाली. या कालावधीमध्ये देशभर प्रचंड राजकीय, सामाजिक,आर्थिक बदल झाले. पण आदिवासींच्या जीवनामध्ये मात्र काहीच बदल झालेले नाहीत. त्यांच्या समस्या तेव्हा होत्या त्यापेक्षा वाढल्या आहेत. आजही ते गरीबच असून त्यांचे जीवन चित्रपटाच्या नायकाप्रमाणे एक जिवंत शोकांतिका बनले आहे.

चित्रपट सृष्टीलाही विसर-च्‘जैत रे जैत’ च्या चित्रीकरणासाठी मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीमधील दिग्गज कलाकार जवळपास तीन महिने कर्नाळा परिसरात होते. चित्रपटातील एक गीत रानसई गावामध्ये चित्रित करण्यात आले. च्पायथ्याला असलेल्या कल्ले गावासह कर्नाळा किल्ला व परिसरात सर्व चित्रीकरण झाले. प्रचंड यश मिळाल्यानंतर चित्रपट सृष्टी येथील आदिवासींना विसरून गेली. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणी काहीच प्रयत्न केले नाहीत.