शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

डेंग्यू, मलेरियाचे थैमान

By admin | Updated: October 10, 2016 03:46 IST

महानगरपालिका क्षेत्रामध्ये डेंग्यू व मलेरियाचे थैमान सुरू आहे. रूग्णांची संख्या प्रचंड वाढली असून सर्वच रूग्णालयांमधील आयसीयू विभाग हाऊसफुल्ल

नामदेव मोरे / नवी मुंबईमहानगरपालिका क्षेत्रामध्ये डेंग्यू व मलेरियाचे थैमान सुरू आहे. रूग्णांची संख्या प्रचंड वाढली असून सर्वच रूग्णालयांमधील आयसीयू विभाग हाऊसफुल्ल झाले आहेत. बोनसरीमध्ये राहणाऱ्या ओमकार रंगीलाल यादव (१८) या तरूणाला वेळेत उपचार मिळाले नसल्याने मृत्यू झाला आहे. शहरवासी भयभीत झाले असताना महापालिका प्रशासन मात्र साथ नियंत्रणात असल्याचा दावा करून जबाबदारी झटकत आहे. एमआयडीसीमधील बोनसरीगाव व परिसरामध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली आहे. अनेक रूग्ण महापालिका व इतर रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही धुरीकरण व औषध फवारणी केली जात नाही. याच परिसरामध्ये राहणाऱ्या ओमकार रंगीलाल यादव या तरूणाला डेंग्यूची लागण झाली. शनिवारी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने रात्री ८ वाजता महापालिकेच्या प्रथम संदर्भ रूग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी रूग्णालयामधील आयसीयूमध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे रूग्णास जे.जे. किंवा इतर ठिकाणी घेवून जावे असा सल्ला दिला. खूप विनंती करूनही काहीही उपयोग झाला नसल्याने अखेर त्या तरूणास नेरूळमधील डॉ. डी.वाय. पाटील रूग्णालयात नेण्यात आले. तेथे तत्काळ उपचार सुरू केले. पण रूग्णास तातडीने आयसीयू विभागात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. तेथील आयसीयूमध्येही जागा नसल्याने सोबत आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तेरणा व इतर रूग्णालयांमध्ये चौकशी केली पण तेथेही आयसीयूमध्ये जागा शिल्लक नव्हती. अखेर साडेदहा वाजण्याच्या सुमारास या तरूणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. शहरात सर्वच परिसरामध्ये डेंग्यू, मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. पण महापालिका प्रशासन मात्र साथ नियंत्रणात असून गतवर्षीपेक्षा रूग्णांची संख्या कमी असल्याचे सांगत आहे. करावे, दारावे, तुर्भे इंदिरानगर, गोठीवली, घणसोली व इतर परिसरामध्ये स्थिती हाताबाहेर जावू लागली आहे. शहरातील सर्वच रूग्णालयांमध्ये रूग्णांच्या रांगा लागल्या आहेत. खाजगी रूग्णालयामधील डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर डेंग्यू, मलेरियाचे थैमान सुरू असल्याचे मान्य केले. तापाच्या रूग्णांची संख्या वाढल्याने आयसीयू विभागात एकही बेड शिल्लक नाही. महापालिकेने ऐरोली, नेरूळ व सीबीडीमध्ये रूग्णालये बांधली आहेत पण ती वेळेत सुरू झाली नाहीत. यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. पालिका रूग्णालयामध्ये गेलेल्या रूग्णांना जागा शिल्लक नसल्याचे कारण देवून मुंबई व इतर ठिकाणी जाण्यास भाग पाडले जात आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने रूग्णांना जीव गमवावा लागत आहे. महापालिकेकडे तक्रार केल्यास उपाययोजना होण्याऐवजी गुन्हे दाखल होण्याची भीती वाटत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व स्तरातून तीव्र्र नाराजी व्यक्त होत आहे. च्डेंग्यूमुळे मृत्यू झालेला ओमकार रंगीलाल यादव तरूण मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. गरिबीमुळे रोजगारासाठी मुंबईत आला. च्वेटरचे काम करणाऱ्या ओमकारला डेंग्यू झाल्यानंतर वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत. ताप कमी होत नसल्याने त्याने वडिलांना फोन करून मला गावी घेवून जा असा निरोप दिला. वडील शनिवारी मुंंबईसाठी निघाले आहेत.