शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

डेंग्यू, मलेरियाचे थैमान

By admin | Updated: October 10, 2016 03:46 IST

महानगरपालिका क्षेत्रामध्ये डेंग्यू व मलेरियाचे थैमान सुरू आहे. रूग्णांची संख्या प्रचंड वाढली असून सर्वच रूग्णालयांमधील आयसीयू विभाग हाऊसफुल्ल

नामदेव मोरे / नवी मुंबईमहानगरपालिका क्षेत्रामध्ये डेंग्यू व मलेरियाचे थैमान सुरू आहे. रूग्णांची संख्या प्रचंड वाढली असून सर्वच रूग्णालयांमधील आयसीयू विभाग हाऊसफुल्ल झाले आहेत. बोनसरीमध्ये राहणाऱ्या ओमकार रंगीलाल यादव (१८) या तरूणाला वेळेत उपचार मिळाले नसल्याने मृत्यू झाला आहे. शहरवासी भयभीत झाले असताना महापालिका प्रशासन मात्र साथ नियंत्रणात असल्याचा दावा करून जबाबदारी झटकत आहे. एमआयडीसीमधील बोनसरीगाव व परिसरामध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ पसरली आहे. अनेक रूग्ण महापालिका व इतर रूग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते दीपक गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही धुरीकरण व औषध फवारणी केली जात नाही. याच परिसरामध्ये राहणाऱ्या ओमकार रंगीलाल यादव या तरूणाला डेंग्यूची लागण झाली. शनिवारी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने रात्री ८ वाजता महापालिकेच्या प्रथम संदर्भ रूग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी रूग्णालयामधील आयसीयूमध्ये जागाच शिल्लक नाही. यामुळे रूग्णास जे.जे. किंवा इतर ठिकाणी घेवून जावे असा सल्ला दिला. खूप विनंती करूनही काहीही उपयोग झाला नसल्याने अखेर त्या तरूणास नेरूळमधील डॉ. डी.वाय. पाटील रूग्णालयात नेण्यात आले. तेथे तत्काळ उपचार सुरू केले. पण रूग्णास तातडीने आयसीयू विभागात ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. तेथील आयसीयूमध्येही जागा नसल्याने सोबत आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी तेरणा व इतर रूग्णालयांमध्ये चौकशी केली पण तेथेही आयसीयूमध्ये जागा शिल्लक नव्हती. अखेर साडेदहा वाजण्याच्या सुमारास या तरूणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला. शहरात सर्वच परिसरामध्ये डेंग्यू, मलेरियाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. पण महापालिका प्रशासन मात्र साथ नियंत्रणात असून गतवर्षीपेक्षा रूग्णांची संख्या कमी असल्याचे सांगत आहे. करावे, दारावे, तुर्भे इंदिरानगर, गोठीवली, घणसोली व इतर परिसरामध्ये स्थिती हाताबाहेर जावू लागली आहे. शहरातील सर्वच रूग्णालयांमध्ये रूग्णांच्या रांगा लागल्या आहेत. खाजगी रूग्णालयामधील डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर डेंग्यू, मलेरियाचे थैमान सुरू असल्याचे मान्य केले. तापाच्या रूग्णांची संख्या वाढल्याने आयसीयू विभागात एकही बेड शिल्लक नाही. महापालिकेने ऐरोली, नेरूळ व सीबीडीमध्ये रूग्णालये बांधली आहेत पण ती वेळेत सुरू झाली नाहीत. यामुळे रूग्णांची हेळसांड होत आहे. पालिका रूग्णालयामध्ये गेलेल्या रूग्णांना जागा शिल्लक नसल्याचे कारण देवून मुंबई व इतर ठिकाणी जाण्यास भाग पाडले जात आहे. योग्य उपचार मिळत नसल्याने रूग्णांना जीव गमवावा लागत आहे. महापालिकेकडे तक्रार केल्यास उपाययोजना होण्याऐवजी गुन्हे दाखल होण्याची भीती वाटत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्व स्तरातून तीव्र्र नाराजी व्यक्त होत आहे. च्डेंग्यूमुळे मृत्यू झालेला ओमकार रंगीलाल यादव तरूण मूळचा उत्तरप्रदेशचा आहे. गरिबीमुळे रोजगारासाठी मुंबईत आला. च्वेटरचे काम करणाऱ्या ओमकारला डेंग्यू झाल्यानंतर वेळेत योग्य उपचार मिळाले नाहीत. ताप कमी होत नसल्याने त्याने वडिलांना फोन करून मला गावी घेवून जा असा निरोप दिला. वडील शनिवारी मुंंबईसाठी निघाले आहेत.