शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
4
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
5
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
6
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
7
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
8
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
9
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
10
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
11
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
13
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
14
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
15
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
16
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
17
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
18
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
19
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
20
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका

coronavirus: ई-पासची अट रद्द होताच महामार्गावर वाहनांची गर्दी, वाशी टोल नाक्यावर वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2020 12:58 AM

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने मार्चपासून आंतरजिल्हा प्रवासावरही मर्यादा घातल्या होत्या. ई-पासशिवाय मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हते व गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा मुंबईला येता येत नव्हते.

नवी मुंबई : शासनाने अंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची अट रद्द करताच महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाशी टोल नाक्यावर सकाळी वाहतूककोंडी झाली होती. दोन अपघातांमुळे तेथील चक्काजाममध्ये भर पडली होती.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने मार्चपासून आंतरजिल्हा प्रवासावरही मर्यादा घातल्या होत्या. ई-पासशिवाय मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हते व गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा मुंबईला येता येत नव्हते. शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतरही हजारो नागरिक गावीच थांबले होते.गणेशोत्सव करूनच मुंबईला जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. शासनाने ई-पासची अट रद्द करताच, मंगळवारी रात्रीच चाकरमानी मुंबईकडे रवाना झाले. यामुळे मुंबई-पुणे व मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. सकाळी वाशी टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाली होती. टोल नाक्यापासून वाशी प्लाझापर्यंत रांगा आल्या होत्या.अपघातामुळे चक्काजामसकाळी खाली पुलावर दोन अपघात झाले. पुलाच्या सुरुवातीला चार वाहने एकमेकांवर आदळली. दुसऱ्या अपघातामध्ये दोन कारची धडक झाली. अपघातांमुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यावर दुपारी १२ नंबर वाहतूक सुरळीत झाली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई