शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

coronavirus: एपीएमसीत उपाययोजनांवर पाणी , मार्केटबाहेर अनधिकृत व्यवसाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 2:53 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद केली आहे; परंतु मार्केटबाहेर रस्त्यावर अनधिकृतपणे व्यापार सुरू झाला आहे. नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या व्यवसायामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. तसे न झाल्यास एपीएमसीत प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांवर पाणी फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, घणसोली व नेरुळ परिसरात मार्केटमुळे प्रादुर्भाव वाढला आहे. व्यापारी, माथाडी कामगार, एपीएमसी कर्मचारी, वाहतूकदारांनाही लागण झाली आहे. यामुळे शासनाने ११ ते १७ मे दरम्यान एपीएमसी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.प्रत्येक मार्केटची साफसफाई व निर्जंतुकीकरण सुरू केले आहे. मार्केटमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष उपाययोजना सुरू असताना मार्केटच्या बाहेर रस्त्यावर अनधिकृत व्यापार जोमाने सुरू झाला आहे.कांदा-बटाटा मार्केटच्या बाहेर अन्नपूर्णा चौक ते अरेंजा सर्कलजवळील पेट्रोल पंपापर्यंत कांदा, बटाटाचे टेम्पो उभे केले जात आहेत. खरेदीसाठी ग्राहकही गर्दी करू लागले आहेत. अनेक विक्रेते व ग्राहक मास्कचा वापर करत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होताना दिसत नाही. यामुळे पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.एपीएमसीच्या गेटबाहेरील भाजी व फळ विक्रेत्यांना लागण झाली आहे. यामुळे तुर्भे विभाग अधिकारी व पोलिसांनी फळविक्रेत्यांवर कारवाई केली होती. त्यामुळे काही दिवस अनधिकृत व्यवसाय थांबला होता. मात्र, आता मार्केट बंद असल्याने कांदा, बटाटासह फळांचाही अनधिकृत व्यापार सुरू झाला आहे.स्मशानभूमी ते एनएमएमटी डेपोकडील रस्त्यापर्यंत फळांचे टेम्पो उभे केले जात असून तेथेच व्यापार केला जात आहे. एपीएमसीच्या बाहेरील व्यापारावर कारवाई करण्याचा अधिकार एपीएमसी प्रशासनास नाही. यामुळे नवी मुंबई महापालिका व पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कारवाई केली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेरील रस्त्यावर अनधिकृतपणे व्यापार करणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. कारवाईनंतरही व्यापार सुरू असेल तर पुन्हा कारवाई केली जाईल.- दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ-१सर्व उपाययोजनांवर पाणी : कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी महापालिका व एपीएमसी प्रशासन प्रयत्न करत आहेत. पाचही मार्केटमधील १०० टक्के व्यवहार बंद केले आहेत. आरोग्य शिबिर सुरू आहे. औषध फवारणी सुरू आहे; परंतु दुसरीकडे मार्केटच्या गेटबाहेरील अनागोंदी कारभार सुरू आहे. रस्त्यावरील अतिक्रमण थांबविले नाही तर कोरोना रोखण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई