शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

CoronaVirus: कोरोना नियंत्रणासाठी सूक्ष्म नियोजन; १०० जणांची नियमित ऑनलाइन मीटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 23:42 IST

प्रत्येक रुग्णावर लक्ष : १०० जणांची नियमित ऑनलाइन मीटिंग

नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून नवी मुंबई सावरू लागली आहे. रुग्ण वाढ नियंत्रणात आली असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. घातक ठरलेली लाट थोपविण्यासाठी मनपाने सूक्ष्म नियोजन व सर्वेक्षणावर भर दिला आहे. 

प्रत्येक सेक्टर व इमारतनिहाय रुग्णांची नोंद ठेवली जात आहे. आयुक्त अभिजित बांगर प्रतिदिन सायंकाळी तीन तास आढावा बैठक घेत असून त्यामध्ये सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, विभाग अधिकारी, नोडल अधिकारी मिळून जवळपास १०० जणांचा समावेश असून त्यांच्याकडून दिवसभरातील आढावा व दुसऱ्या दिवसाचे नियोजन केले जात आहे.

नवी मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती. मनपाने फक्त वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्र सुरू ठेवले होते. शहरातील तीन नागरी आरोग्य केंद्रांचा परिसर कोरोनामुक्त झाला होता; परंतु मार्चपासून रुग्ण झपाट्याने वाढू लागले व आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. त्यामुळे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी रुग्णालयीन सुविधा वाढविण्याबरोबर प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म सर्वेक्षण करून नियोजन करण्यास सुरुवात केली.

रुग्णांचा आरोग्य केंद्रनिहाय आढावा ठेवला जातो. याशिवाय प्रत्येक सेक्टर, प्रत्येक इमारतनिहाय वस्तुस्थितीदर्शक आकडेवारीसह अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अहवालामुळे कोणत्या इमारतीमध्ये, कोणत्या सेक्टरमध्ये व कोणत्या नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात रुग्ण वाढत आहेत. कोणत्या वयोगटातील रुग्ण वाढत आहेत. मृत्यूचे प्रमाण काेठे व कोणत्या वयोगटातील जास्त आहे याची दैनंदिन आकडेवारी तयार करून त्यावर अभ्यास करून उपाययोजना करण्यास सुरुवात केली.

कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याशिवाय उपचार सुरू असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले. विभाग अधिकारी व प्रत्येक विभाग कार्यालयासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आला. डॉक्टर्स व अधिकारी यांची जवळपास १०० जणांची मुख्य टीम तयार झाली आहे. या सर्व डॉक्टर्स व अधिकारी यांच्यासोबत सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा अशी तीन तास बैठक घेतली जात आहे. दिवसभरातील कामाचा आढावा. कुठे समाधानकारक काम सुरू आहे. कुठे उणिवा राहत आहेत. ठरविलेले काम झाले का, या सर्वांविषयी आढावा घेऊन दुसऱ्या दिवसाचे नियोजन करणे, अशा प्रकारे कामकाज केले जात आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई