शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

उद्योगांची गाडी रुळावर आणण्यासाठी कसरत सुरू; नुकसान भरून काढण्याचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 00:41 IST

Corona Lockdown Effect on Industry: कामगारांची कमतरता : तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ११७४ कारखाने आहेत. यामधील अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणारे ३७० कारखाने लाॅकडाऊनमध्येही सुरू होते.

नामदेव माेरे नवी मुंबई  : ठाणे-बेलापूर व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पुन्हा सुरू होऊ लागले आहेत. सहा  महिन्यांत झालेले प्रचंड आर्थिक नुकसान भरून काढण्याचे आव्हान उद्योजकांसमोर उभे राहिले आहे. कारखाने सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी कामगार उपलब्ध नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू करण्यात अडथळे निर्माण होत आहेत. 

कोरोनाचा सर्वाधिक फटका औद्योगिक वसाहतींना बसला होता. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ४५०० कारखाने आहेत. अत्याश्यक सेवा देणारे कारखाने वगळता इतर सर्व उद्योग बंद ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील व इतर राज्यांतील कामगारही त्यांच्या मूळ गावी गेले होते. अद्याप ५० टक्के कामगार कामावर येऊ शकलेले नाहीत. यामध्ये इतर राज्यांतील कामगारांची संख्या मोठी आहे. कामगारच नसल्यामुळे शासनाने परवानगी देऊनही कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करता येत नाहीत. कामगारांना घेऊन येण्यासाठी रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही उद्योजकांनी केली आहे. अनेकांनी खासगी बसेसनी कामगारांना घेऊन येण्याची तयारी सुरू केली आहे. 

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास ११७४ कारखाने आहेत. यामधील अत्यावश्यक सेवेशी संबंधित असणारे ३७० कारखाने लाॅकडाऊनमध्येही सुरू होते. उर्वरित ८०४ कारखान्यांमधील काही कारखाने सुरू  झाले असून, काही सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कामगारांची कमतरता हीच प्रमुख समस्या सध्या मोठ्या प्रमाणात सर्वांसमोर आहे. 

कुठल्या क्षेत्रात उद्योग सुरू ?

नवी मुंबई व तळोजामध्ये लाॅकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग सुरू होते. उत्पादन करणारे कारखाने बंद होते. शासनाने आदेश दिल्यानंतर सर्व कारखाने सुरू होत आहेत. आयटी कंपन्या, सेवा उद्योग व छोटे कारखाने सुरू झाले आहेत

दिवाळीपर्यंत सर्व सुरळीत होईल 

औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखाने सहा महिने बंद होेते. बंद कारखाने सुरू करताना कामगारांची कमतरता सर्वांनाच जाणवू लागली आहे. याशिवाय कारखान्यांची देखभाल-दुरुस्ती, कच्चा माल व इतर काही समस्या आहेत. हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागेल. 

तळोजामध्ये  50000कोटींचा फटका बसला

नवी मुंबईमधील ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत व तळोजा औद्योगिक वसाहतीमधील  अनेक कारखाने लाॅकडाऊनच्या काळात बंद होेते. सहा महिन्यांत तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ५० हजार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. नवी मुंबईमध्ये यापेक्षाही जास्त व्यवहार ठप्प झाले असण्याची शक्यता आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मनुष्यबळाची कमतरता हे कारण प्रमुख आहे. गावी गेलेल्या कामगारांना परत  आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परराज्यातील कामगारांना आणण्यासाठी वाहतुकीची समस्या जाणवत आहे. - के. आर. गोपी, अध्यक्ष, टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (टीएमआयए)

तळोजातील अत्यावश्यक सेवा देणारे उद्योग लाॅकडाऊनमध्येही सुरू होते. उर्वरित कारखाने सुरू करण्यासही परवानगी मिळाली आहे. कामगार व इतर काही अडचणींमुळे पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू होत नाहीत. पुढील एक महिन्यात सर्व व्यवहार सुरू होऊ शकतील. - सतीश शेट्टी, अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन (टीआयए)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या