शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

‘तिसरी मुंबई’वरून संघर्ष; २२.५ टक्के योजनेवर संताप

By नारायण जाधव | Updated: March 24, 2026 11:41 IST

हक्कांचा गळा घोटून भूसंपादन मान्य नाही : १२४ गावांचा इशारा

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : कर्नाळा, साई आणि चिरनेर परिसरातील १२४ गावांतील जमिनीवर ‘नवनगर’ अर्थात ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पासाठी राज्य सरकारने १६ मार्च २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयाने संतापाची ठिणगी पेटली असून, शेतकरी थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश धुडकावून २२.५% योजनेद्वारे भूसंपादन रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करून शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.

केंद्राच्या भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना अधिनियम, २०१३ नुसार बाजारभावाच्या चारपट रोख मोबदला आणि २० टक्के विकसित भूखंडाचा कायमस्वरूपी मालकी हक्क मिळणे अपेक्षित असताना, शासन मात्र १५.७५% भाडेपट्ट्याचा भूखंड देणारी २२.५% योजना लादत आहे. यामुळे “ही योजना नव्हे, हक्कांवर सरळ डाका आहे,” अशा शब्दांत संतप्त प्रतिक्रिया नोंदवून शेतकरी नेत्यांनी गावागावात बैठका घेणे सुरू केले आहे. आगामी काळात याप्रकरणी मोठा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

बाजारभाव आणि संपादन दरातील दरीही चव्हाट्यावर

बाजारभाव आणि संपादन दरातील दरीही चव्हाट्यावर आली आहे. उलवे-नोडसारख्या भागात लाखो रुपयांचा दर असताना, संपादनासाठी मात्र कमी दर लावले जात आहेत. “सरकार जमीन स्वस्तात घेते आणि महागात विकते,” असा थेट आरोप शेतकरी शहाजी पाटील यांनी केला.

त्यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयासह सिडको आणि एमएमआरडीएकडे यासंदर्भात पत्रव्यवहारही केला आहे. यूडीसीपीआर २०२० नुसार चटईक्षेत्र निर्देशांक ०.२० वरून १.१० पर्यंत वाढल्याने जमिनीची किंमत किमान पाचपट वाढणे अपेक्षित असताना, मोबदल्यात त्याचा विचार होत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा त्यांचा दावा आहे.

मुळात शासनाची ‘तिसरी मुंबई’ हा प्रकल्प भांडवलदार, बिल्डरांशी आहे. यात कोठेही रोजगार नाही, उद्योग येणार नाहीत. शेतकऱ्यांना विस्थापित करण्याचे हे कारस्थान आहे. शेतकऱ्यांना भूसंपादन कायदा २०१३ नुसार भरपाई दिली तरच लाभ होणार आहे. २२.५ टक्के योजनेत ते देशोधडीला लागतील. तेवढी जमीन त्यांना मिळतच नाही. यापूर्वीही सिडको साडेबारा टक्के योजनेत ८.३३ टक्केच  जमीन देते. नैनामध्येही सिडको ४० टक्के सांगत असली, तरी प्रत्यक्षात ३० टक्केच जमीन देते. ही शुद्ध फसवणूक आहे. - ॲड. सुरेश ठाकूर, शेतकरी नेते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Farmers protest 'Third Mumbai' land acquisition; 22.5% scheme sparks anger.

Web Summary : Farmers are protesting the government's 'Third Mumbai' project, opposing the 22.5% land acquisition scheme. They demand compensation as per the 2013 act, fearing displacement and inadequate returns. A major conflict looms over land rates and fair compensation.
टॅग्स :mmrdaएमएमआरडीए