शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
2
अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
3
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
4
ZP Election 2026: मोठी बातमी! १२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची आज घोषणा होणार? थोड्याच वेळात आयोगाची पत्रकार परिषद 
5
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
6
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
7
धक्कादायक! प्रेयसीने 'बाय-बाय डिकू' म्हटलं अन् तरुणाने आयुष्य संपवलं; कपाटात लपलेलं होतं मृत्यूचं रहस्य
8
फक्त 5.59 लाख रुपयांत TATA PUNCH Facelift २०२६ लॉन्च; आजपासून बुकिंग सुरू, जबरदस्त आहे लूक
9
Gold-Silver च्या दरानं तोडले सर्व विक्रम; १३ दिवसांत ₹३२,३२७ नं वाढली चांदी, सोन्याच्या दरात ₹७२८७ ची तेजी
10
'ओ रोमिओ'चा टीझर पाहून फरिदा जलाल यांच्याच डायलॉगची चर्चा; म्हणाल्या, "मी शिवी दिली कारण..."
11
“बाळासाहेबांचे स्वप्न साकार करूया”; मनसेच्या निष्ठावंताची पत्रातून मतदारांना भावनिक साद
12
भयंकर! खेळताना कपडे खराब झाले म्हणून ६ वर्षांच्या लेकीला सावत्र आईने बदडलं; चिमुरडीचा जागीच मृत्यू
13
Mumbai Local: लोकलच्या गर्दीने घेतला आणखी एक बळी; नाहूर स्थानकाजवळ धावत्या ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू
14
Nashik Municipal Election 2026 : अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर साकारणार; कुंभमेळामंत्री गिरीश महाजनांची घोषणा
15
Nashik Municipal Election 2026 : बिग फाइटने वेधलं मतदारांचं लक्ष; कोण ठरणार सरस? अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला
16
‘बाथरूममध्ये मीच आधी जाणार!’, किरकोळ वादातून भावाने केली भावाची हत्या, मध्ये आलेल्या आईलाही संपवले 
17
३२ वर्षीय तरुण बनणार टाटा ग्रुपचे पॉवर सेंटर? विश्वस्तांच्या वादात नोएल टाटांची पकड मजबूत
18
तुमचा पोर्टफोलिओ बनवा 'पॉवरफुल'! सिमेंट, ऊर्जा आणि विमा क्षेत्रातील हे शेअर्स देणार बंपर परतावा
19
अमेरिकेची मोठी कारवाई! वर्षभरात एक लाखांहून अधिक व्हिसा रद्द; भारतीय विद्यार्थी, व्यावसायिकांच्या अडचणी वाढणार?
20
मुंबईत उद्धवसेना अन् मनसेला किती जागा मिळणार?; भाजपाच्या बड्या नेत्याने थेट आकडाच सांगितला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा राज्यात भारनियमन नसल्याचा दावा; सरकारी कार्यालयात प्रीपेड मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:52 IST

थकीत वीजबिल वसूल करणे, हे महावितरणासमोर कडवे आव्हान असते. विशेष म्हणजे, सरकारी कार्यालयातील थकबाकी वसूल करणे हे जिकिरीचे काम मानले जाते. सरकारी धोरणांमुळे वेळेत वीजबिल भरणे होत नसते.

पनवेल : थकीत वीजबिल वसूल करणे, हे महावितरणासमोर कडवे आव्हान असते. विशेष म्हणजे, सरकारी कार्यालयातील थकबाकी वसूल करणे हे जिकिरीचे काम मानले जाते. सरकारी धोरणांमुळे वेळेत वीजबिल भरणे होत नसते. यावर तोडगा म्हणून महावितरणने सरकारी कार्यालयांत जवळपास तीन हजार प्रीपेड मीटर सुरू केले आहेत. तसेच राज्यात कुठेच भारनियमन नसल्याचा दावा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे.ऊर्जा विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षांत राज्यात केलेल्या विकासकामांसंदर्भात माहिती देण्यासाठी पाठक नवीन पनवेलमधील एका सभागृहात उपस्थित होते. त्यांनी महावितरणचा चार वर्षांतील लेखाजोखा मांडला. या वेळी महावितरणचे कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे, भांडुप नागरी परिमंडळच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण उपस्थित होत्या.राज्यात थकीत वीजबिलांची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. यात सरकारी कार्यालयांचाही मोठा समावेश आहे. सरकारी निधीचा अभाव, विविध शासकीय अडचणींमुळे सरकारी कार्यालयांमार्फत हे वीजबिल वेळेवर भरता येत नसल्याने राज्यात सरकारी प्रीपेड मीटर बसविण्यास सुरु वात करण्यात आली आहे.राज्यात आतापर्यंत तीन हजार मीटर बसविण्यात आले आहेत. भविष्यात यामध्ये वाढ होणार आहे. सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करणाऱ्यांकडून महावितरण त्या ठिकाणच्या दराप्रमाणे वीज खरेदी करीत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. एचओडीएसद्वारे राज्यात सुमारे पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.पेपरलेस बिल भरणाºया ग्राहकांना एका बिलामागे सुमारे दहा रुपयांची सूट दिली जाते. रायगड जिल्ह्यात सध्याच्या घडीला ११ हजार नवीन वीजजोडणीची मागणी आहे. वीजमीटरचा तुटवडा दूर झाल्याने १५ ते २० दिवसांत सर्व ग्राहकांना नवीन जोडणी मिळणार आहे.महावितरणमार्फत शासनाने राबविलेल्या वीजधोरणाचा लेखाजोखा मांडण्यासंदर्भात प्रथमच सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी काढण्यात आलेल्या माहितीपुस्तकात राज्यात कुठेही भारनियमन होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यात स्थानिक पातळीवर तात्पुरत्या तांत्रिक कारणांचा अपवाद वगळता सध्या कुठेही भारनियमन केले जात नाही. आवश्यक असणारी वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, मेरिट आॅर्डर डिस्पॅचनुसार कमी किमतीची वीज खरेदी करण्यात येत आहे. महावितरणच्या माध्यमातून २३ एप्रिल २०१८ रोजी राज्यात २३ हजार ७०० एवढ्या मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. काही वर्षांत वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे केली जात असल्यामुळे, एवढ्या मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाल्याचा दावा करण्यात आला आहे.भारनियमनमुक्त राज्यमहावितरणच्या दृष्टीने राज्यात विजेची जेवढी मागणी आहे, तेवढी मागणी आम्ही यशस्वीरीत्या ग्राहकांना पुरवत असल्याने महाराष्ट्र राज्य भारनियममुक्त असल्याचे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी स्पष्ट केले. यंदा २२ आॅक्टोबर २०१८ पर्यंत राज्यात २४९०० मेगावॅट विजेची मागणी होती. ती मागणी महावितरणने यशस्वीरीत्या पुरविली असल्याने महाराष्ट्र राज्य भारनियमनमुक्त असल्याचा दावा महावितरण करीत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण