शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

महावितरणचा राज्यात भारनियमन नसल्याचा दावा; सरकारी कार्यालयात प्रीपेड मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:52 IST

थकीत वीजबिल वसूल करणे, हे महावितरणासमोर कडवे आव्हान असते. विशेष म्हणजे, सरकारी कार्यालयातील थकबाकी वसूल करणे हे जिकिरीचे काम मानले जाते. सरकारी धोरणांमुळे वेळेत वीजबिल भरणे होत नसते.

पनवेल : थकीत वीजबिल वसूल करणे, हे महावितरणासमोर कडवे आव्हान असते. विशेष म्हणजे, सरकारी कार्यालयातील थकबाकी वसूल करणे हे जिकिरीचे काम मानले जाते. सरकारी धोरणांमुळे वेळेत वीजबिल भरणे होत नसते. यावर तोडगा म्हणून महावितरणने सरकारी कार्यालयांत जवळपास तीन हजार प्रीपेड मीटर सुरू केले आहेत. तसेच राज्यात कुठेच भारनियमन नसल्याचा दावा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे.ऊर्जा विभागाच्या वतीने गेल्या चार वर्षांत राज्यात केलेल्या विकासकामांसंदर्भात माहिती देण्यासाठी पाठक नवीन पनवेलमधील एका सभागृहात उपस्थित होते. त्यांनी महावितरणचा चार वर्षांतील लेखाजोखा मांडला. या वेळी महावितरणचे कोकण प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे, भांडुप नागरी परिमंडळच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण उपस्थित होत्या.राज्यात थकीत वीजबिलांची रक्कम कोट्यवधींच्या घरात आहे. यात सरकारी कार्यालयांचाही मोठा समावेश आहे. सरकारी निधीचा अभाव, विविध शासकीय अडचणींमुळे सरकारी कार्यालयांमार्फत हे वीजबिल वेळेवर भरता येत नसल्याने राज्यात सरकारी प्रीपेड मीटर बसविण्यास सुरु वात करण्यात आली आहे.राज्यात आतापर्यंत तीन हजार मीटर बसविण्यात आले आहेत. भविष्यात यामध्ये वाढ होणार आहे. सौरऊर्जेद्वारे वीजनिर्मिती करणाऱ्यांकडून महावितरण त्या ठिकाणच्या दराप्रमाणे वीज खरेदी करीत असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. एचओडीएसद्वारे राज्यात सुमारे पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.पेपरलेस बिल भरणाºया ग्राहकांना एका बिलामागे सुमारे दहा रुपयांची सूट दिली जाते. रायगड जिल्ह्यात सध्याच्या घडीला ११ हजार नवीन वीजजोडणीची मागणी आहे. वीजमीटरचा तुटवडा दूर झाल्याने १५ ते २० दिवसांत सर्व ग्राहकांना नवीन जोडणी मिळणार आहे.महावितरणमार्फत शासनाने राबविलेल्या वीजधोरणाचा लेखाजोखा मांडण्यासंदर्भात प्रथमच सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी काढण्यात आलेल्या माहितीपुस्तकात राज्यात कुठेही भारनियमन होत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्यात स्थानिक पातळीवर तात्पुरत्या तांत्रिक कारणांचा अपवाद वगळता सध्या कुठेही भारनियमन केले जात नाही. आवश्यक असणारी वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, मेरिट आॅर्डर डिस्पॅचनुसार कमी किमतीची वीज खरेदी करण्यात येत आहे. महावितरणच्या माध्यमातून २३ एप्रिल २०१८ रोजी राज्यात २३ हजार ७०० एवढ्या मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. काही वर्षांत वीज यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे केली जात असल्यामुळे, एवढ्या मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य झाल्याचा दावा करण्यात आला आहे.भारनियमनमुक्त राज्यमहावितरणच्या दृष्टीने राज्यात विजेची जेवढी मागणी आहे, तेवढी मागणी आम्ही यशस्वीरीत्या ग्राहकांना पुरवत असल्याने महाराष्ट्र राज्य भारनियममुक्त असल्याचे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी स्पष्ट केले. यंदा २२ आॅक्टोबर २०१८ पर्यंत राज्यात २४९०० मेगावॅट विजेची मागणी होती. ती मागणी महावितरणने यशस्वीरीत्या पुरविली असल्याने महाराष्ट्र राज्य भारनियमनमुक्त असल्याचा दावा महावितरण करीत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण