शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

मोठी बातमी: ‘एमएमआरडीए’साठी एकच परिवहन सेवा?; वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती दोन महिन्यांत देणार अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 09:41 IST

वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून, या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशासाठी एकच परिवहन प्राधिकरण सेवा असावी, यादृष्टीने राज्य सरकारने पुढचे पाऊल टाकले  आहे. सध्या मुंबईची बेस्ट, नवी मुंबईची एनएमएमटी, ठाण्याची टीएमटी, कल्याण-डोंबिवलीची केडीएमटीसह वसई-विरार पालिकेची स्वतंत्र परिवहन  सेवा आहे. मात्र, या सर्व प्राधिकरण सेवांचे एकत्रिकरण करून एकीकृत प्राधिकरण स्थापन करण्याचे नगरविकास विभागाने ठरविले  आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली असून, या समितीला दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

या समितीत बेस्टच्या महाव्यवस्थापक अश्विनी जोशी, नवी मुंबई पालिका आयुक्त कैलास शिंदे, ठाणे पालिका आयुक्त सौरभ  राव, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांचा समावेश आहे.मुंबई महानगर प्रदेशात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, पनवेल परिसरात नागरिकरण होत आहे. 

वसई-विरार, पालघर या शहरांतही औद्योगिकीकरण वाढले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अटल सेतू, उरण-द्रोणागिरी पट्ट्यातील नियोजित तिसऱ्या मुंबईच्या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील नागरिकरणही वेग पकडणार आहे. यामुळे महानगर प्रदेशातील परिवहन व्यवस्थांचे नियंत्रण, व्यवस्थापन एकाच व्यवस्थेमार्फत करता येईल का, याचा अभ्यास करून या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर करायचा आहे.

नियंत्रणासाठी प्राधिकरण स्थापन करणारमहानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एमएमआरडीए, सर्व पालिका, पोलिस यंत्रणेत समन्वय साधून कनेक्टिव्हिटी वाढून शहरांतील रहिवाशांचा प्रवास सुकर, सुसज्ज व्हावा यासाठी नवे परिवहन प्राधिकरण स्थापन करता येईल का? या परिवहन प्राधिकरणास वैधानिक दर्जा देता येईल का? तसेच त्याची कार्यपद्धती नेमकी कशी असेल, नियंत्रण कसे ठेवता येईल? याचा अभ्याससुद्धा समितीने करायचा आहे.

...म्हणून एकीकृत परिवहनचा विचारसध्या वसई-विरार पालिकेची परिवहन सेवा बेताचीच आहे. उल्हासनगरची परिवहन कागदावरच आहे. पनवेलने आता बससेवेसाठी सल्लागार नेमला आहे. भिवंडीत गोदामपट्टा व अपर ठाणेतील गृहप्रकल्प वाढत आहेत.  एमएमआरडीए भागात तिसरी मुंबई वसणार आहे.  यामुळे भविष्यात रेल्वे-मेट्रो स्थानकापासून शहराच्या अंतर्गत भागात जाण्यासाठी बससेवा फायदेशीर ठरणार आहे. यामुळेच महामुंबईसाठी एकीकृत परिवहन सेवेचा विचार पुढे आला आहे.

टॅग्स :mmrdaएमएमआरडीए