शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 01:47 IST

देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. ४३ वर्षांमध्ये दहा जणांना हे पद भूषविण्याची संधी मिळाली असून, मराठवाड्याला दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने घातलेली बंदी उठणार असून, रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. मुंबईमधील कृषी व्यापार स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. शासनाने जानेवारी, १९७७ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची स्थापना करून सर्व कृषी व्यापार एका छत्राखाली आणला. पा. शी देशमुख यांची पहिले सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. एक महिन्यानंतर कि़ बा. म्हस्के यांची सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. बाजारसमितीचे काम चांगले सुरू झाले असतानाच, मुंबईमधील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बाजारसमिती नवी मुंबईत स्थलांतरिच करण्याचा निर्णय घेण्यात आला व टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्थलांतरित केल्या आहेत. ४३ वर्षांमध्ये तब्बल दहा जणांनी सभापतीपद भूषविले आहे. बाजारसमितीचे संचालक होण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांमध्ये चढाओढ असते. नाशिकचे देवीदास पिंगळे खासदार असताना मुंबई बाजारसमितीवर संचालक होते. पुणे जिल्ह्यातील आमदार कुमार गोसावी यांनीही सभापतीपद भूषविले आहे. जिंतूरचे यापूर्वीचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सभापतीपद भूषविले असून, अनेक वर्षे ते बाजारसमितीवर संचालक होते. माजी मंत्री शशिकांत शिंदे हेही बाजारसमितीवर अनेक वर्षांपासून संचालक आहेत.डिसेंबर, २०१४ मध्ये शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासकीय मंडळांनी धोरणात्मक निर्णय घेऊ नये, यासाठी काही सामाजिक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास निर्बंध घातले होते. शासनाने वेळेत निवडणूक घेतली नसल्याने तब्बल सहा वर्षे प्रशासकीय राजवट सुरू राहिली. या काळात कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी व इतर सर्व धोरणात्मक प्रकल्पांचे काम ठप्प झाले होते. बाजारसमितीच्या विकासाला गती मिळत नव्हती. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संचालक मंडळ कसे काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.असे असते संचालक मंडळ : मुंबई बाजारसमितीवर १८ लोकनियुक्त संचालक असतात. त्यांच्यामध्ये सहा महसूल विभागातून प्रत्येकी दोन असे १२ शेतकरी प्रतिनिधी. पाच व्यापारी प्रतिनिधी व एका कामगार प्रतिनिधीचा समावेश असतो. सभापती व उपसभापतींची निवड झाल्यानंतर शासन पाच सदस्यांची नियुक्ती करते. मुंबई व नवी मुंबई महापालिकेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, पणन संचालक व बाजारसमिती सचिव असे एकूण २७ जणांचे संचालक मंडळ असते.विद्यमान संचालक पुढीलप्रमाणे : मुंबई बाजारसमितीवर सद्यस्थितीमध्ये अशोक डक(सभापती), धनंजय वाडकर (उपसभापती), बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण देशमुख, माधवराव जाधव, सुधीर कोठारी, हुकुमचंद आमधरे, अद्वय हिरे, जयदत्त होळकर, वैजनाथ शिंदे, शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, नीलेश वीरा, विजय भुत्ता, संजय पानसरे व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.बाजार समितीच्या स्थापनेपासूनचे सभापतीनाव कार्यकाळपा. शि. देशमुख जानेवारी, १९७७ ते फेब्रुवारी, १९७७कि़ बा. म्हस्के फेब्रुवारी, १९७७ ते जानेवारी, १९८१व्ही. जी. शिवदारे जानेवारी, १९८१ ते फेब्रुवारी, १९८४व्ही. के. बोरावके मार्च, १९८६ ते मार्च, १९८८रामप्रसाद बोर्डीकर मार्च, १९८८ ते एप्रिल, १९९५कुमार गोसावी डिसेंबर, २००१ ते फेब्रुवारी, २००५द्वारकाप्रसाद काकाणी फेब्रुवारी, २००५ ते जानेवारी, २००८दिलीप काळे डिसेंबर, २००८ ते आॅगस्ट, २०१०बाळासाहेब सोळसकर सप्टेंबर, २०१० ते डिसेंबर, २०१४अशोक डक आॅगस्ट २०२० पासून पुढे

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई