शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 01:47 IST

देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. ४३ वर्षांमध्ये दहा जणांना हे पद भूषविण्याची संधी मिळाली असून, मराठवाड्याला दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने घातलेली बंदी उठणार असून, रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. मुंबईमधील कृषी व्यापार स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. शासनाने जानेवारी, १९७७ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची स्थापना करून सर्व कृषी व्यापार एका छत्राखाली आणला. पा. शी देशमुख यांची पहिले सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. एक महिन्यानंतर कि़ बा. म्हस्के यांची सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. बाजारसमितीचे काम चांगले सुरू झाले असतानाच, मुंबईमधील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बाजारसमिती नवी मुंबईत स्थलांतरिच करण्याचा निर्णय घेण्यात आला व टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्थलांतरित केल्या आहेत. ४३ वर्षांमध्ये तब्बल दहा जणांनी सभापतीपद भूषविले आहे. बाजारसमितीचे संचालक होण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांमध्ये चढाओढ असते. नाशिकचे देवीदास पिंगळे खासदार असताना मुंबई बाजारसमितीवर संचालक होते. पुणे जिल्ह्यातील आमदार कुमार गोसावी यांनीही सभापतीपद भूषविले आहे. जिंतूरचे यापूर्वीचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सभापतीपद भूषविले असून, अनेक वर्षे ते बाजारसमितीवर संचालक होते. माजी मंत्री शशिकांत शिंदे हेही बाजारसमितीवर अनेक वर्षांपासून संचालक आहेत.डिसेंबर, २०१४ मध्ये शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासकीय मंडळांनी धोरणात्मक निर्णय घेऊ नये, यासाठी काही सामाजिक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास निर्बंध घातले होते. शासनाने वेळेत निवडणूक घेतली नसल्याने तब्बल सहा वर्षे प्रशासकीय राजवट सुरू राहिली. या काळात कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी व इतर सर्व धोरणात्मक प्रकल्पांचे काम ठप्प झाले होते. बाजारसमितीच्या विकासाला गती मिळत नव्हती. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संचालक मंडळ कसे काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.असे असते संचालक मंडळ : मुंबई बाजारसमितीवर १८ लोकनियुक्त संचालक असतात. त्यांच्यामध्ये सहा महसूल विभागातून प्रत्येकी दोन असे १२ शेतकरी प्रतिनिधी. पाच व्यापारी प्रतिनिधी व एका कामगार प्रतिनिधीचा समावेश असतो. सभापती व उपसभापतींची निवड झाल्यानंतर शासन पाच सदस्यांची नियुक्ती करते. मुंबई व नवी मुंबई महापालिकेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, पणन संचालक व बाजारसमिती सचिव असे एकूण २७ जणांचे संचालक मंडळ असते.विद्यमान संचालक पुढीलप्रमाणे : मुंबई बाजारसमितीवर सद्यस्थितीमध्ये अशोक डक(सभापती), धनंजय वाडकर (उपसभापती), बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण देशमुख, माधवराव जाधव, सुधीर कोठारी, हुकुमचंद आमधरे, अद्वय हिरे, जयदत्त होळकर, वैजनाथ शिंदे, शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, नीलेश वीरा, विजय भुत्ता, संजय पानसरे व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.बाजार समितीच्या स्थापनेपासूनचे सभापतीनाव कार्यकाळपा. शि. देशमुख जानेवारी, १९७७ ते फेब्रुवारी, १९७७कि़ बा. म्हस्के फेब्रुवारी, १९७७ ते जानेवारी, १९८१व्ही. जी. शिवदारे जानेवारी, १९८१ ते फेब्रुवारी, १९८४व्ही. के. बोरावके मार्च, १९८६ ते मार्च, १९८८रामप्रसाद बोर्डीकर मार्च, १९८८ ते एप्रिल, १९९५कुमार गोसावी डिसेंबर, २००१ ते फेब्रुवारी, २००५द्वारकाप्रसाद काकाणी फेब्रुवारी, २००५ ते जानेवारी, २००८दिलीप काळे डिसेंबर, २००८ ते आॅगस्ट, २०१०बाळासाहेब सोळसकर सप्टेंबर, २०१० ते डिसेंबर, २०१४अशोक डक आॅगस्ट २०२० पासून पुढे

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई