शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 01:47 IST

देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. ४३ वर्षांमध्ये दहा जणांना हे पद भूषविण्याची संधी मिळाली असून, मराठवाड्याला दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने घातलेली बंदी उठणार असून, रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. मुंबईमधील कृषी व्यापार स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. शासनाने जानेवारी, १९७७ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची स्थापना करून सर्व कृषी व्यापार एका छत्राखाली आणला. पा. शी देशमुख यांची पहिले सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. एक महिन्यानंतर कि़ बा. म्हस्के यांची सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. बाजारसमितीचे काम चांगले सुरू झाले असतानाच, मुंबईमधील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बाजारसमिती नवी मुंबईत स्थलांतरिच करण्याचा निर्णय घेण्यात आला व टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्थलांतरित केल्या आहेत. ४३ वर्षांमध्ये तब्बल दहा जणांनी सभापतीपद भूषविले आहे. बाजारसमितीचे संचालक होण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांमध्ये चढाओढ असते. नाशिकचे देवीदास पिंगळे खासदार असताना मुंबई बाजारसमितीवर संचालक होते. पुणे जिल्ह्यातील आमदार कुमार गोसावी यांनीही सभापतीपद भूषविले आहे. जिंतूरचे यापूर्वीचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सभापतीपद भूषविले असून, अनेक वर्षे ते बाजारसमितीवर संचालक होते. माजी मंत्री शशिकांत शिंदे हेही बाजारसमितीवर अनेक वर्षांपासून संचालक आहेत.डिसेंबर, २०१४ मध्ये शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासकीय मंडळांनी धोरणात्मक निर्णय घेऊ नये, यासाठी काही सामाजिक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास निर्बंध घातले होते. शासनाने वेळेत निवडणूक घेतली नसल्याने तब्बल सहा वर्षे प्रशासकीय राजवट सुरू राहिली. या काळात कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी व इतर सर्व धोरणात्मक प्रकल्पांचे काम ठप्प झाले होते. बाजारसमितीच्या विकासाला गती मिळत नव्हती. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संचालक मंडळ कसे काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.असे असते संचालक मंडळ : मुंबई बाजारसमितीवर १८ लोकनियुक्त संचालक असतात. त्यांच्यामध्ये सहा महसूल विभागातून प्रत्येकी दोन असे १२ शेतकरी प्रतिनिधी. पाच व्यापारी प्रतिनिधी व एका कामगार प्रतिनिधीचा समावेश असतो. सभापती व उपसभापतींची निवड झाल्यानंतर शासन पाच सदस्यांची नियुक्ती करते. मुंबई व नवी मुंबई महापालिकेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, पणन संचालक व बाजारसमिती सचिव असे एकूण २७ जणांचे संचालक मंडळ असते.विद्यमान संचालक पुढीलप्रमाणे : मुंबई बाजारसमितीवर सद्यस्थितीमध्ये अशोक डक(सभापती), धनंजय वाडकर (उपसभापती), बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण देशमुख, माधवराव जाधव, सुधीर कोठारी, हुकुमचंद आमधरे, अद्वय हिरे, जयदत्त होळकर, वैजनाथ शिंदे, शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, नीलेश वीरा, विजय भुत्ता, संजय पानसरे व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.बाजार समितीच्या स्थापनेपासूनचे सभापतीनाव कार्यकाळपा. शि. देशमुख जानेवारी, १९७७ ते फेब्रुवारी, १९७७कि़ बा. म्हस्के फेब्रुवारी, १९७७ ते जानेवारी, १९८१व्ही. जी. शिवदारे जानेवारी, १९८१ ते फेब्रुवारी, १९८४व्ही. के. बोरावके मार्च, १९८६ ते मार्च, १९८८रामप्रसाद बोर्डीकर मार्च, १९८८ ते एप्रिल, १९९५कुमार गोसावी डिसेंबर, २००१ ते फेब्रुवारी, २००५द्वारकाप्रसाद काकाणी फेब्रुवारी, २००५ ते जानेवारी, २००८दिलीप काळे डिसेंबर, २००८ ते आॅगस्ट, २०१०बाळासाहेब सोळसकर सप्टेंबर, २०१० ते डिसेंबर, २०१४अशोक डक आॅगस्ट २०२० पासून पुढे

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई