शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

दुर्घटनेनंतरही महावितरण निद्रिस्तच, घणसोलीसह ऐरोलीमध्ये परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:57 AM

कळवा व सानपाडा येथील विद्युत उपकेंद्रांना आग लागल्यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या असून, केबल अस्ताव्यस्त पसरल्या आहेत.

- अनंत पाटीलनवी मुंबई : कळवा व सानपाडा येथील विद्युत उपकेंद्रांना आग लागल्यानंतरही महावितरण प्रशासनाला जाग आलेली नाही. शहरामध्ये अनेक ठिकाणी विद्युत डीपी उघड्या असून, केबल अस्ताव्यस्त पसरल्या आहेत. ऐरोली ते घणसोली दरम्यानची स्थिती बिकट असून, वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घणसोली गावठाण, ऐरोली, दिवा कोळीवाडामधील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकांमध्ये महावितरणने उभ्या केलेल्या विद्युत रोहित्रांच्या डीपी उघड्याच असल्याने शाळकरी विद्यार्थी, तसेच वाहनधारकांबरोबरच पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. घणसोली विभागात २५पेक्षा जास्त बॉक्स उघडे असल्याचे निदर्शनास आले आहे. घणसोली परिसरातील नागरिकांनी महापालिका आणि महावितरणकडे अनेक तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महापलिकेचे सहायक आयुक्त आणि विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता सखाराम खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, उघड्या डीपी बॉक्सची समस्या कायम असून, महापालिकेच्या वतीने लेखी तक्र ार करून आता तीन आठवड्यांचा कालावधी उलटूनही गेला असल्याचे सांगितले.दिवा-कोळीवाडा सेक्टर ९ येथे होळी मैदानाच्या शेजारी या अंतर्गत विजेचा दाब नियमन करण्यासाठी ठिकठिकाणी विद्युत रोहित्रांची उभारणी करण्यात आली आहे. येथील रोहित्रासह डीपी बॉक्स उघड्या अवस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे. घणसोली गावदेवी मंदिर, कोळीवाडा, शेतकरी शिक्षण संस्थेचे महाविद्यालय, पाटीलआळी, चिंचआळी, दत्तनगर, तळवली गाव, नोसिलनाका सेक्टर २१, छत्रपती शिवाजी तलाव, खदान तलाव, वैभव पतपेढी जवळ, रबाळे स्मशानभूमी, वीटभट्टी रोड, रबाळे रेल्वेस्थानक, गोठीवली महावितरण कार्यालयाजवळ, मासळी मार्केट साईबाबा मंदिर, गोल्डननगर, गोठीवली विठ्ठल-रखुमाई मंदिर यांच्यासह एकूण २५ डीपी बॉक्सची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. डीपीतील वीज तारा, उघडे फ्युज, सर्वसामान्य नागरिकांच्या हाताला येतील, अशा पद्धतीने हे बॉक्स आहेत, तसेच रस्त्याच्या कडेला एखादा अपघात झाला तर उघड्या डीपीवर वाहन आदळून मोठी घटनाही घडू शकते.डीपीचे दरवाजे तारेने बांधलेले असल्याचे पाहावयास मिळतात. दिवा-कोळीवाडा होळी मैदान परिसरातील डीपीचे आणि जनित्रांचे दरवाजे वर्षाचे बाराही महिने खुलेच असल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता टाळता येत नाही.उघड्या डीपी बॉक्स आणि ओव्हरहेड जीर्ण केबल्स संदर्भात घणसोली विभागातील शेकडो लोकांच्या तक्र ारी महापालिकेकडे आलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही ५० ठिकाणी सर्वेक्षण केले असता, यात २५ ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका असल्याची गंभीर परिस्थिती आढळून आल्याने यासंदर्भात वीज महावितरण कंपनीकडे दुरु स्तीबाबत तीन आठवड्यापूर्वी लेखी तक्र ार केली आहे.- दत्तात्रेय नागरे, सहायक आयुक्त, घणसोली, महापालिकानवी मुंबई महापलिकेच्या वतीने तसेच नागरिकांच्या वतीने उघड्या डीपी बॉक्स विषयी महावितरणकडे लेखी तक्र ार करण्यात आलेली आहे. दुरु स्तीसाठी ठेकेदारामार्फत डीपी बॉक्स लॉकिंगचे आणि उघड्या केबल्स नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण होणार असल्यामुळे उघड्या डीपीचा प्रश्न कायमचा सुटेल.- दीपक शिंदे, सहायक अभियंता, वीज महावितरण ऐरोली विभाग.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई