शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

द्रोणागिरीच्या पायथ्यावरील हजार घरांवर ‘दरडींचे ढग’; पर्यायी जागेत वस्ती हलविण्याचा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 16:34 IST

शासनाच्या विविध खात्यांच्या आणि काही ठेकेदारांच्या अल्पशा आर्थिक लोभापायी द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी सातत्याने होणाऱ्या उत्खननामुळे मागील दोन वर्षांपासून दरड कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे हजारो रहिवासी मृत्यूच्या दरडींखाली जीवन जगत आहेत. 

मधुकर ठाकूर -

उरण : करंजा - द्रोणागिरी मंदिरापासून चारफाटा येथील डाऊरनगरपर्यंतच्या सुमारे चार किलोमीटर क्षेत्रात डोंगराच्या पायथ्याशी जवळपास असलेली एक हजार कच्ची-पक्की घरे दरडींच्या सावटाखाली आहेत. शासनाच्या विविध खात्यांच्या आणि काही ठेकेदारांच्या अल्पशा आर्थिक लोभापायी द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी सातत्याने होणाऱ्या उत्खननामुळे मागील दोन वर्षांपासून दरड कोसळण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे हजारो रहिवासी मृत्यूच्या दरडींखाली जीवन जगत आहेत. 

डोंगराच्या पायथ्याशी सातघर, गोकुळनगर, तांडेलनगर, गणेशनगर, डाऊरनगर या लोकवस्तीत सुमारे एक हजारांच्या आसपास कच्ची-पक्की घरे आहेत. तर ओएनजीसीच्या समुद्राकडील बाजूला काही आदिवासी वस्ती आहे. जागा अधिकृत की अनधिकृत याचा मागचा-पुढचा विचार न करता शेकडो गरीब-गरजूंनी विविध बिल्डरांकडून जागा खरेदी करून आयुष्याची पुंजी खर्च करून घरे बांधली आहेत. 

महत्त्वाचे म्हणजे करंजा-रेवस रो-रो सेवेचा आरक्षित रस्ता याच मार्गाने जाणार आहे. त्याच्या आरक्षणात शेकडो घरे बाधित होणार आहेत. मात्र, याकडे विविध शासकीय विभागांनी दुर्लक्ष केल्याने बेकायदा  बांधकामांना ऊत आला आहे. अशातच मागील १०-१२ वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर उत्खनन केले जात आहे. यामुळे डाेंगराचा वरचा भाग कमजोर होऊन दोन वर्षांपासून दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

शासकीय यंत्रणाच चिमूटभर मिळणाऱ्या रॉयल्टीसाठी हपापलेली आहे, असा आरोप उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी केला आहे.  तर द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी सुरू असलेले उत्खनन थांबविण्यासाठी तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रारी, निवेदन दिली आहेत, असे नवापाडा ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष मनोहर कोळी यांनी सांगितले.

पर्यायी जागेबद्दल विचार सुरू द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पायथ्याशी वसलेली वस्ती हटवून पर्यायी जागेत हलविणे, सध्या तरी हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. या पर्यायाबाबत विचारविनिमय सुरू असून, त्याचा अहवाल शासनाकडे लवकरच पाठविणार असल्याची माहिती उरण तहसीलदार उद्धव कदम यांनी दिली.

द्रोणागिरी नाव कसे पडले ?उरण तालुक्यातील चाणजे महसुली हद्दीत द्रोणागिरी डोंगर आहे. अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरच असलेल्या या डोंगराच्या निर्मितीबाबत एक पौराणिक दंतकथा प्रचलित आहे. राम-रावण युद्धात मूर्छीत लक्ष्मणाला दिव्य औषधी वनस्पती असलेला डोंगरच हनुमान हवाई मार्गाने नेत असताना पडलेला ढेकूळ म्हणजेच द्रोणागिरी डोंगर, अशी आख्यायिका आहे. सध्या त्याच्या पायथ्याशी केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ओएनजीसी प्रकल्प आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईlandslidesभूस्खलन