शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाने केली आत्महत्या,'अग्निपथ' योजनेमुळे होता नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 16:06 IST

Suicide Case :भरतीसाठी केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात कटकसह ओडिशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. याशिवाय देशभरात या योजनेला विरोध होत आहे.

भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अग्निपथ योजनेमुळेच त्याने आत्महत्या केल्याचे मित्र आणि कुटुंबीयांचे म्हणणे आहे. लष्करात भरतीसाठी घेतलेली लेखी परीक्षा रद्द झाल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. भरतीसाठी केंद्र सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात कटकसह ओडिशात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू झाली आहेत. याशिवाय देशभरात या योजनेला विरोध होत आहे.बालासोर जिल्ह्यातील सोरोच्या तेंतई गावात राहणारा धनंजय मोहंती हा तरुण सैन्यात भरती होण्यासाठी मेहनत घेत होता. बुधवारी रात्री उशिरा त्याने छताला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. मीडियाशी बोलताना धनंजयचा मित्र पिताबस राज म्हणाला की, तो माझा चांगला मित्र होता. आम्ही गेल्या चार वर्षांपासून सैन्यात भरती होण्याची तयारी करत होतो. माझा मित्र धनंजय दीड वर्षापूर्वी फिजिकल फिटनेस टेस्ट पास झाला. त्यांना लष्कराकडून लेखी परीक्षेचे आश्वासन मिळाले होते. कोरोनाच्या काळात लेखी परीक्षा अनेकदा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर अग्निपथ योजनेमुळे ती रद्द करण्यात आली.या निदर्शनाची बातमी Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून मिळालीमित्राने सांगितले की, Whatsapp ग्रुपच्या माध्यमातून त्याला कळले की, उत्तर प्रदेश, बिहार आणि कोलकाता येथील अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. हा सर्व प्रकार पाहून धनंजयचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने काल रात्री आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मला मेसेज केला होता. या सरकारवर विश्वास ठेवू नका आणि त्यांना कधीही मत देऊ नका, असे मित्र पिताबस म्हणाला. अग्निपथ योजनेची घोषणा केल्यानंतर लष्कराने लेखी परीक्षा रद्द केली, त्यामुळे मुलाने असे पाऊल उचलले, असा आरोप मृताच्या वडिलांनी केला आहे. धनंजयच्या मृत्यूचे वृत्त समजताच कुटुंबावर शोककळा पसरली. धनंजयच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांना त्याचे अवयव दान करायचे होते. मात्र, सोरो रुग्णालयात अवयवदानाची सुविधा नसल्याने मृतांच्या नातेवाईकांना ते करता आले नाही. शुक्रवारी देशाच्या अनेक भागात निदर्शने झालीइंडिया टुडेशी बोलताना बालासोर पोलिसांचे एसपी सुधांशू मिश्रा म्हणाले की, मला सोरोच्या घटनेची माहिती नाही, मृत्यूचे नेमके कारण तपासावे लागेल. चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्याच्या मोदी सरकारच्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणासह विविध राज्यांमध्ये शुक्रवारी हिंसक निदर्शने सुरूच होती. दरम्यान, विविध राज्यांतील तरुणांच्या हिंसक निदर्शनांदरम्यान केंद्राने गुरुवारी अग्निपथ योजनेंतर्गत भरतीची सर्वाधिक वयोमर्यादा २१ वर्षांवरून २३ वर्षे केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशSoldierसैनिक