शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मशिदीच्या पायाभरणीवर योगींचं वक्तव्य; म्हणाले - "मला कुणी बोलावणार नाही अन् मी जाणारही नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 18:11 IST

यूपी सरकारने 5 फेब्रुवारीलाच अयोध्या जिल्हा मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोहावल तालुक्यातील धन्नीपूर गावात, रौनाही पोलीस ठाण्यापासून साधारणपणे 200 मीटर मागे 5 एकर जमीन मशिदीसाठी दिली आहे. तेथेच मशीत बांधली जाणार आहे. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर, कोरोना आणि अयोध्येत मशिदीचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा केली.योगी म्हणाले, प्रत्येक संप्रदायाच्या लोकांची या कार्यक्रमात येण्याची इच्छा होती. मात्र, कोरोनामुळे कार्यक्रम छोटा करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी सेन्ट्रल वक्फ बोर्डाला अयोध्येत 5 एकर जमीन देण्याचा निर्णय दिला होता.

अयोध्या - राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर, कोरोना आणि अयोध्येत मशिदीचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा केली. मशिदीच्या पायाभरणीसंदर्भात सीएम योगी म्हणाले, मला कुणी बोलावणार नाही आणि मी जाणारही नाही.

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आले, की विरोधक म्हणत आहेत, आपण सर्व धर्मांच्या लोकांना राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आणि सर्व आलेही. मात्र, काही दिवसांनंतर, जेव्हा अयोध्येत मशिदीच्या बांधकामाला सुरुवात होईल, तेव्हा मुख्यमंत्री तेथे जाणार नाही, असे म्हटले जात आहे.

यावर योगी आदित्यनाथ म्हणाले, माझे जे काम आहे, ते मी करेल आणि मी माझ्या कार्याला नेहमीच कर्तव्य आणि धर्म मानतो. मला माहीत आहे, की मला कुणी बोलावणार नाही. यामुळे मी जाणारही नाही.

सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी सेन्ट्रल वक्फ बोर्डाला अयोध्येत 5 एकर जमीन देण्याचा निर्णय दिला होता. यूपी सरकारने 5 फेब्रुवारीलाच अयोध्या जिल्हा मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर असलेल्या सोहावल तालुक्यातील धन्नीपूर गावात, रौनाही पोलीस ठाण्यापासून साधारणपणे 200 मीटर मागे 5 एकर जमीन मशिदीसाठी दिली आहे. तेथेच मशीत बांधली जाणार आहे. 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या 'राम सर्वांचेच आहेत' या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, राम सर्वांचेच आहेत, हे आम्ही आधीपासूनच म्हणत आलो आहोत. ही सद्बुद्धी आधीही यायला हवी होती.

योगी म्हणाले, प्रत्येक संप्रदायाच्या लोकांची या कार्यक्रमात येण्याची इच्छा होती. मात्र, कोरोनामुळे कार्यक्रम छोटा करण्यात आला. केवळ काँग्रेसच नाही, तर भाजपाचेही कोणतेही नेते या कार्यक्रमात सहभागी झाले नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्षदेखील कार्यक्रमात सहभागी झाले नही. यावेळी योगींनी अयोध्येच्या विकासकामांवरही भाष्य केले.

महत्त्वाच्या बातम्या -

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : शतकांची प्रतीक्षा संपली, राम जन्मभूमी आज मुक्त झाली - नरेंद्र मोदी

Ayodhya Ram Mandir Bhumipujan : "पाच शतकांनंतर आज 135 कोटी भारतीयांचा संकल्प पूर्ण होतोय"

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

'या' 3 सरकारी बँकांचे होणार खासगीकरण? नीती आयोगाचा सरकारला सल्ला

Corona Vaccine: पुण्याच्या सीरम इस्टिट्यूटचा मोठा दावा, सर्वात पहिले अन् सर्वात मोठ्या प्रमाणावर तयार करणार लस

तंबाखूपासून तयार केली कोरोना लस? मानवी चाचणीसाठी मागितली परवानगी...

युवकाच्या 'जीन्स'मध्ये घुसला 'कोब्रा', खांबाला धरून काढावी लागली अख्खी रात्र; मग...

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMosqueमशिदUttar Pradeshउत्तर प्रदेशAyodhyaअयोध्या