शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

UP Election 2022: “शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही, ३५० जागा जिंकून मी पुन्हा येईन”: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 3:02 PM

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा येईन, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

ठळक मुद्देपुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहेशेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाहीभाजप रेकॉर्ड तोडत ३२५ ते ३५० जागा जिंकेल

लखनऊ:उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण आणखी तापताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या १० महिन्यांपासून आंदोलन सुरू असून, अलीकडेच पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात उत्तर प्रदेशमधील ८०० ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केले, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा मोठा फटका भाजपला बसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यातच या शक्यता खोडून काढत शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा येईन, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. (yogi adityanath says opposition faces credibility crisis bjp will get 325 350 seats)

आगामी निवडणुकीत राज्यात भाजपा सहजच जिंकेल. भाजप फक्त जिंकणारच नाही, तर २०१७ मध्ये ३१२ जागा जिंकण्याचा रेकॉर्ड तोडत ३२५ ते ३५० जागा जिंकेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. आतापर्यंतची राज्य सरकारची कामगिरी, आर्थिक विकास, राज्यातील कायदा व सुव्यवस्था पाहूनच पुन्हा एकदा विजय प्राप्त होईल. सरकारच्या कारभाराच्या रेकॉर्डवर लक्ष केंद्रित करून आणि जातीय समीकरणाचा समतोल साधून कोणत्याही सत्ताविरोधावर मात करता येऊ शकेल, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

पुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे

भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडणार नाही. मला पुन्हा जिंकून येण्याबद्दल पूर्ण विश्वास आहे. उत्तर प्रदेशची राजकीय गतिशीलता चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो, कारण गेल्या २३ वर्षांपासून राज्याच्या सक्रिय राजकारणात आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांची राजकीय समज आणि परिपक्वतेबद्दल विश्वास आहे, असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले. ते हिंदुस्थान टाइम्सशी बोलत होते. 

दरम्यान, भाजपने आरपीआयशी युती करून आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढली पाहिजे. भाजपाने आम्हाला १० ते १२ जागा द्याव्यात. भाजपाध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला असून, भाजपाने आमच्यासोबत निवडणूक लढवली तर बसपाला मोठा धक्का बसेल असे सांगितले आहे, अशी ऑफर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अलीकडेच दिल्याचे सांगितले जात आहे.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाElectionनिवडणूकUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण