शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

'वर्क फ्रॉम होम'मुळे भारतीयांचं काम सरासरी ३२ मिनिटांनी वाढलं!

By मोरेश्वर येरम | Updated: November 29, 2020 10:57 IST

ऑस्ट्रेलियातील 'अॅटलासन' या सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीने जगातील ६५ देशांमधील कामाचे सर्वेक्षण केले आहे. यात कर्मचारी कामाच्या वेळेच्या आधी काम सुरू करून ते उशिरापर्यंत काम करत असल्याचं आढळून आलं आहे.

ठळक मुद्दे'वर्क फ्रॉम होम'मुळे काम आणि घर यांची सरमिसळ झालीवर्क फ्रॉम होममुळे कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्याचं निष्पन्नइस्राइलमध्ये कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक कामाचे तास वाढले

नवी दिल्लीघाईघाईत जेवण करणं असो किंवा मग न संपणाऱ्या व्हिडिओ कॉन्फरन्स कोरोना काळात 'वर्क फ्रॉम होम'मुळे कामाच्या तासांमध्ये वाढ झाल्याचे हे पुरावे कमी वाटत असतील तर आता एक अहवाल प्रसिद्ध झालाय यातून भारतीयांच्या कामाच्या तासांत वाढ झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 

ऑस्ट्रेलियातील 'अॅटलासन' या सॉफ्टवेअर डेव्हलपर कंपनीने जगातील ६५ देशांमधील कामाचे सर्वेक्षण केले आहे. यात कर्मचारी कामाच्या वेळेच्या आधी काम सुरू करून ते उशिरापर्यंत काम करत असल्याचं आढळून आलं आहे. यात इस्राइल सर्वात आघाडीवर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्याच्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यात इस्राइलमधील नागरिकांनी दिवसाला सरासरी ४७ मिनिटं जास्त काम केलं. तर भारतीय नागरिकांनी दररोज सरासरी ३२ मिनिटं जास्त वेळ काम केल्याचं अहवालात नमदू करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही हेच प्रमाण आहे. 

'वर्क फ्रॉम होम'मुळे लांबचा प्रवास टळला असला तरी त्याचा फायदा होतोय अशातलाही काही भाग नाही. हैदराबाद स्थित आयटी कंपनीत कर्मचारी म्हणून काम करत असलेले पुनीत श्रीवास्तव म्हणतात की, "लॉकडाउनच्या आधीच्या वर्क फ्रॉम होममध्ये एक सुसंवाद होता. त्यावेळी घरची कामं संपवून डॉक्टरकडे जाण्यासाठी किंवा मुलांच्या शाळेत जाण्यासाठी वेळ मिळत होता. पण आता मी घरी लॅपटॉपला खिळून असतो. व्हिडिओ मिटिंग्जसाठी कोणत्याही वेळी आम्हाला उपलब्ध राहावं लागतं." 

वर्क फ्रॉम होममध्ये कर्मचारी सकाळी आणि संध्याकाळी सर्वाधिक काम करत असून दुपारी सर्वात कमी काम होत असल्यांचही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. घरातून काम करण्याची मुभा असल्यानं अनेक जणांनी कामात विश्रांती घेऊन पुढे कामाच्या तासांत वाढ होण्याचं अंगवळणी पाडून घेतलं आहे. त्यामुळे घर आणि ऑफीस अशा दोन गोष्टी कर्मचाऱ्यांना वेगळ्या राखता येणं कठीण होऊन बसलं आहे. इतकंच नव्हे तर घरातील अद्याप कोणतीही जबाबदारी नसलेल्यांनाही कामातून स्वत:साठीचा वेळ काढणं कठीण झालं आहे. काहीजण कोणतीही ब्रेक न घेता सलग काम करत आहेत. कोरोना काळात कामाच्या सीमा निश्चित करणं आता कठीण होऊन बसल्याचं अनेकांचं मत आहे. तर २३ टक्के लोक काम संपल्यानंतर आपल्या वैयक्तिक वेळेतही कामाचाच विचार करत असल्याचं समोर आलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलियाCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक