शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आता त्यांचे आमदार माझ्या संपर्कात; मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या दाव्यानं एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 7:52 AM

Madhya Pradesh Political Crisis: भाजपाला आमदार फुटण्याची भीती; सर्व आमदारांना भोपाळमधून हरयाणात हलवलं

ठळक मुद्देभाजपानं आमदारांना भोपाळहून हरयाणात हलवलंसरकार बहुमत सिद्ध करेल; मुख्यमंत्री कमलनाथ यांना विश्वासमध्य प्रदेशात सत्ता संघर्ष शिगेला; काँग्रेसचे बडे नेते भोपाळमध्ये दाखल

भोपाळ: काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेशात राजकीय भूकंप झाला. सिंधिया यांच्या समर्थक आमदारांनीही राजीनामे दिल्यानं राज्यातलं काँग्रेस सरकार धोक्यात आलं आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात जोरदार सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. वीसपेक्षा अधिक आमदारांनी राजीनामे दिल्यानं काँग्रेस सरकार कोसळल्यात जमा आहे. मात्र मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या एका दाव्यामुळे काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. काठावरचं बहुमत असलेलं सरकार चालवणाऱ्या कमलनाथ यांनी काल पत्रकारांशी संवाद साधताना बहुमत सिद्ध करण्याचा दावा केला. 'चिंता करण्याची, घाबरण्याची गरज नाही. आम्ही बहुमत सिद्ध करू. आमचं सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. ज्या आमदारांना त्यांनी कैद केलं आहे, ते माझ्या संपर्कात आहेत,' असं कमलनाथ यांनी म्हटलं. त्यामुळे राज्यातलं सरकार वाचवण्यासाठी काँग्रेस कामाला लागल्याचं दिसत आहे. मुकूल वासनिक, दीपक बावरिया आणि हरिश रावत यांना पक्ष नेतृत्त्वानं दिल्लीहून भोपाळला पाठवलं आहे. तर भाजपानं त्यांच्या सर्व आमदारांना हरयाणातल्या गुरुग्राममधल्या आयटीसी ग्रँड भारत हॉटेलमध्ये हलवलं आहे. भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी राजीनामा दिलेल्या काँग्रेसच्या १९ आमदारांची यादी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली. या बैठकीला ९४ पेक्षा अधिक आमदार उपस्थित होते, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या बैठकीनंतर भाजपानं लगेचच त्यांच्या सर्व आमदारांना भोपाळमध्ये येण्याचे आदेश दिले. या आमदारांना दिल्लीला पाठवण्यात येणार होतं. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास हे आमदार हरयाणातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं. काँग्रेस आमदारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेत्या शोभा ओझा यांनी केला. ज्योतिरादित्य सिंधिया यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याच्या नावाखाली आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली कागदपत्रं राजीनामा म्हणून वापरण्यात आल्याचा दावा ओझा यांनी केला. विधानसभेतल्या बहुमत चाचणीत एकजुटीनं मतदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आमदारांना केल्याची माहिती ओझा यांनी दिली. जोपर्यंत एखादा आमदार स्वत:हून राजीनामा लिहून विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द करत नाही, तोपर्यंत त्याचा राजीनामा वैध समजला जात नाही, असा तांत्रिक मुद्दादेखील त्यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेश