शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

कितीही विरोध करा, सरकार झुकणार नाही; सुधारित नागरिकत्व कायद्यावर अमित शहा ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 7:12 PM

विरोधकांनी हवं तितकं राजकारण करावं; अमित शहांचा आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन देशातलं वातावरण पेटल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अल्पसंख्यांक शरणार्थींना आमचं सरकार नक्कीच नागरिकत्व देईल. विरोधकांना राजकारण करायचं असेल, तर त्यांनी जरुर करावं. भाजपा आणि मोदी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं शहा यांनी म्हटलं. शरणार्थींना भारताचं नागरिकत्व मिळेल. ते भारतीय नागरिक होतील आणि देशात सन्मानानं राहतील, असं अमित शहा म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. विरोधी पक्षांकडून देशाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. अल्पसंख्यांक समुदायातल्या कोणाही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाणार नाही. तशी कोणतीही तरतूद नव्या कायद्यात नाही, याचादेखील त्यांनी पुनरुच्चार केला.  अमित शहांनी उपस्थितांना संबोधित करताना काँग्रेसचा समाचार घेतला. मी काँग्रेसला सांगू इच्छितो की सुधारित नागरिकत्व कायदा नेहरु-लियाकत कराराचा भाग होता. मात्र ७० वर्षांपासून हा कायदा लागू होऊ शकला नाही. कारण तुम्ही कायम मतपेढीचं राजकारण केलं, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. आमच्या सरकारनं सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला आहे. त्यामुळे लाखो-कोटी लोकांना देशाचं नागरिकत्व मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. एकीकडे अमित शहा सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल अतिशय ठाम असताना दुसरीकडे विरोधकांनी हा कायदा मागे घेण्याची मागणी करत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. दिल्ली आणि ईशान्य भारतातली परिस्थिती तणावपूर्ण असल्याचं यानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी म्हटलं. या प्रकरणात राष्ट्रपतींना लक्ष घालण्याची विनंती केल्याचं गांधींनी माध्यमांना सांगितलं. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकAmit Shahअमित शहाBJPभाजपाcongressकाँग्रेस