शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

देशाच्या इंचन् इंच जमिनीवरुन घुसखोरांना बाहेर काढू- शहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 3:22 PM

राज्यसभेत प्रश्नोत्तरादरम्यान शहा आक्रमक

नवी दिल्ली: देशाच्या इंचनइंच जमिनीवरुन घुसखोरांना आणि अवैध प्रवाशांना बाहेर काढू, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यसभेत प्रश्नोत्तरादरम्यान म्हटलं. आसाममध्ये लागू असलेली नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (एनआरसी) आसाम करारचा हिस्सा असल्याचंदेखील शहा म्हणाले. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी राष्ट्रपतींचं भाषण ऐकलं असेल. आम्ही ज्या संकल्पपत्राच्या आधारे निवडून आलो आहोत, त्यामध्ये याचा समावेश आहे, असं शहांनी म्हटलं. देशाच्या इंचनइंच जमिनीवर जितके अवैध प्रवासी, घुसखोर राहतात, त्यांची ओळख पटवली जाईल. यानंतर आंतरराष्ट्रीय कायद्याच्या आधारे त्यांना देशाबाहेर काढलं जाईल, असं शहा म्हणाले. 'एनआरसी लागू करण्यामागील सरकारचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे. काही भारतीयांना भारतीय नागरिक मानलं गेलेलं नाही. अशा २५ लाख लोकांचे अर्ज राष्ट्रपती आणि सरकारकडे आले आहेत. तर देशाबाहेरुन आलेल्या काहींना एनआरसीच्या अंतर्गत भारतीय मानलं गेलं आहे. राष्ट्रपती आणि सरकारकडे आलेल्या अर्जांवर विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे थोडा वेळ मागण्यात आला आहे,' असं शहांनी म्हटलं.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी