शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

गरज पडल्यास नियंत्रण रेषादेखील ओलांडू; लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 10:05 AM

बालाकोटमधील दहशतवादी तळ पाकिस्तानकडून पुन्हा सक्रीय

नवी दिल्ली: भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केलेले बालाकोटमधील दहशतवादी तळ पाकिस्ताननं पुन्हा सक्रीय केले आहेत. या पार्श्वभूमीवर लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर फार काळ लपाछपीचा खेळ चालणार नाही. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा गर्भित इशारा लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी पाकिस्तानला दिला आहे. इंग्रजी वृत्तपत्र 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा इशारा दिला.फेब्रुवारीमध्ये भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक करत बालाकोटमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मात्र अवघ्या सात महिन्यांमध्ये पुन्हा एकदा बालाकोटमध्ये दहशतवादी सक्रीय झाले आहेत. या भागातून २५० ते ५०० दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकनं नेमकं काय हाती लागलं, असा प्रश्न रावत यांना विचारण्यात आला. त्यावर जोपर्यंत सीमेपलीकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात नाही, तोपर्यंत नियंत्रण रेषा ओलांडणार नसल्याचं उत्तर रावत यांनी दिलं. 'पाकिस्तानकडून दहशतवादी नियंत्रित केले जातात. पाकिस्तानच्याच इशाऱ्यावरुन दहशतवादी कारवाया होतात. मात्र हा लपंडाव फार काळ चालणार नाही. गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू. जमिनीवरुन किंवा हवाई मार्गानं नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करण्यास आम्ही कचरणार नाही,' असा स्पष्ट इशारा रावत यांना पाकिस्तानला दिला. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालत नाही, हा पाकिस्तानचा दावा असतो. मात्र पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवाद्यांची शिबिरं भरतात, हे सत्य आहे. दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताविरोधात छुपं युद्ध लढायचं हे पाकिस्तानचं कारस्थान आहे, असंदेखील रावत म्हणाले.  

टॅग्स :Bipin Rawatबिपीन रावतIndian Armyभारतीय जवानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानterroristदहशतवादी