शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

CoronaVirus: कोरोनाच्या लढाईत शनिवार महत्त्वाचा ठरणार; ११ एप्रिलला मोठा निर्णय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 1:21 PM

CoronaVirus पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपेल. त्यामुळे १५ एप्रिलपासून नेमकं काय होणार, लॉकडाऊनमुळे लादण्यात आलेले निर्बंध हटवले जाणार का, लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार की टप्प्याटप्प्यानं निर्बंध मागे घेतले जाणार, असे अनेक प्रश्न सध्या देशवासीयांना पडले आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपत आल्यानं केंद्र आणि राज्य सरकारांनी १५ एप्रिलपासून काय करायचं, याची तयारी सुरू केली आहे. लॉकडाऊन कशा पद्धतीनं हटवायचा, याचा निर्णय येत्या शनिवारी होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ एप्रिल रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून देशातील परिस्थितीचा आढावा घेतील. देशातील लॉकडाऊनबद्दल हटवायचा की वाढवायचा, याबद्दलचा निर्णय याच बैठकीनंतर निर्णय होईल. काही दिवसांपूर्वीच मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत लॉकडाऊनच्या अंमलबजावणीबद्दल कौतुक केलं होतं. याशिवाय लॉकडाऊन कसा हटवला जावा, याबद्दल सूचनादेखील करण्यास सांगितल्या होत्या. हातावर पोट असलेल्या कोट्यवधी मजूर आणि कामगारांवर लॉकडाऊनचा अतिशय गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण आढळून न आलेल्या भागात लागू असलेले निर्बंध शिथिल करण्यात यावेत, असं केंद्राला वाटत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र बहुतांश राज्यांचा लॉकडाऊन हटवण्यास विरोध आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं राज्य सरकारं चिंतेत आहेत. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येनं ५ हजारांचा टप्पा ओलांडला असून मृतांची संख्या दीडशेहून अधिक आहे. कोरोनाबाधितांची वाढती आकडेवारी चिंताजनक आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम अतिशय गंभीर असल्याचं केंद्र सरकारमधील काहींना वाटतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १४ एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे रेड झोन वगळता इतर भागांतील लॉकडाऊन शिथिल करण्यात यावं, असा एक मतप्रवाह सचिवालयातील अधिकारी वर्ग, नीती आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतो आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी