शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

400 जागा आल्यानंतर भाजप संविधान बदलणार? रामदास आठवले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:36 IST

कर्नाटकातील भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यासंदर्भात विचारले असता, आठवले बोलत होते.

संविधान बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही. ज्यांना संविधान बदलायचे असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. संविधानाच्या प्रिअॅम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. मात्र, नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यासंदर्भात विचारले असता, आठवले बोलत होते.

ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही -सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, "मला वाटते हेगडे हे बऱ्याच वेळा दलितांच्या विरोधात अनपेक्षित भूमिका ते मांडत असतात. त्यांच्या भूमिकेचा आणि नरेंद्र मोदी यांचा काही संबंध नाही. त्यांच्या भूमिकेचा आणि भाजपच्या भूमिकेचा कसलाही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका पूर्णपणे बदललेली आहे. जेव्हा त्यांची भूमिका लिमिटेड होती. तेव्हा त्यांचे 1982 मध्ये दोनच खासदार होते. अटलजींच्या काळात ते 182 झाले, नरेद्र मोदी यांच्याकाळात 282 झाले, नंतर 303 झाले. आता 370 पर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता हेगडे नेहमीच विपर्यस्त अशा पद्धतीची भूमिका मांडत असतात आणि आता संविधान बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही, ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही." 

...यामुळे संविधान कुणालाही बदलता येणार नाही -आठवले म्हणाले, "संविधानाच्या प्रिअॅम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. पण नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे. जसे, आता महिला आरक्षणाचा कायदा झाला. पार्लमेंटच्या प्रत्येक सेशनमध्ये अनेक विधेयकं येत असतात. त्यात नवीन कायदे करण्याचाही प्रयत्न असतो. त्यात जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न असतो. तेथे बहुमताने विधेयके मंजूर होतात आणि त्याचे कायदे होतात. यामुळे संविधान कुणालाही बदलता येणार नाही."

जेपी नड्डा यांना पत्र पाठवणार -"हेगडेंच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे अशी आमची मागणी आहे. त्यांनी मागच्या वेळीही दलितांच्या संदर्भात अशीच विपर्यस्त भूमिका मांडली होती. त्यामुळे आमच्या 400 जागा आल्या की आम्ही संविधान बदलणार, अशा पद्धतीची विपर्यस्त भूमिका मांडणे योग्य नाही. त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आपण जेपी नड्डा यांना एक पत्र पाठवणार आहोत," असेही आठवले म्हणाले.

"मला असे वाटते की सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची आहे. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आलेलो आहोत. काही मुद्द्यांवर मतभेद असतीलही. पण एनडीएसोबत जॉर्ज फर्नांडीस होते, शरद यादव होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, नवीन पटनायक होते, त्यामुळे मला वाटते की, तसे परिवर्तन समाजात झालेले आहे," असेही आठवले यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण