शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

400 जागा आल्यानंतर भाजप संविधान बदलणार? रामदास आठवले स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:36 IST

कर्नाटकातील भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यासंदर्भात विचारले असता, आठवले बोलत होते.

संविधान बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही. ज्यांना संविधान बदलायचे असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. संविधानाच्या प्रिअॅम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. मात्र, नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी नुकतेच संविधान बदलण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. यासंदर्भात विचारले असता, आठवले बोलत होते.

ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही -सांगली येथे पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले, "मला वाटते हेगडे हे बऱ्याच वेळा दलितांच्या विरोधात अनपेक्षित भूमिका ते मांडत असतात. त्यांच्या भूमिकेचा आणि नरेंद्र मोदी यांचा काही संबंध नाही. त्यांच्या भूमिकेचा आणि भाजपच्या भूमिकेचा कसलाही संबंध नाही. भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका पूर्णपणे बदललेली आहे. जेव्हा त्यांची भूमिका लिमिटेड होती. तेव्हा त्यांचे 1982 मध्ये दोनच खासदार होते. अटलजींच्या काळात ते 182 झाले, नरेद्र मोदी यांच्याकाळात 282 झाले, नंतर 303 झाले. आता 370 पर्यंत जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे आता हेगडे नेहमीच विपर्यस्त अशा पद्धतीची भूमिका मांडत असतात आणि आता संविधान बदलण्याचा कुणालाही अधिकार नाही, ज्यांना संविधान बदलायचं असेल त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही." 

...यामुळे संविधान कुणालाही बदलता येणार नाही -आठवले म्हणाले, "संविधानाच्या प्रिअॅम्बलमध्ये कसल्याही प्रकारचा बदल होऊ शकत नाही. पण नवीन कायदे करण्याचा अधिकार आहे. जसे, आता महिला आरक्षणाचा कायदा झाला. पार्लमेंटच्या प्रत्येक सेशनमध्ये अनेक विधेयकं येत असतात. त्यात नवीन कायदे करण्याचाही प्रयत्न असतो. त्यात जुन्या कायद्यांमध्ये बदल करण्याचाही प्रयत्न असतो. तेथे बहुमताने विधेयके मंजूर होतात आणि त्याचे कायदे होतात. यामुळे संविधान कुणालाही बदलता येणार नाही."

जेपी नड्डा यांना पत्र पाठवणार -"हेगडेंच्या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे अशी आमची मागणी आहे. त्यांनी मागच्या वेळीही दलितांच्या संदर्भात अशीच विपर्यस्त भूमिका मांडली होती. त्यामुळे आमच्या 400 जागा आल्या की आम्ही संविधान बदलणार, अशा पद्धतीची विपर्यस्त भूमिका मांडणे योग्य नाही. त्याचा आम्ही निषेध करतो आणि भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आपण जेपी नड्डा यांना एक पत्र पाठवणार आहोत," असेही आठवले म्हणाले.

"मला असे वाटते की सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारची आहे. आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर एकत्रित आलेलो आहोत. काही मुद्द्यांवर मतभेद असतीलही. पण एनडीएसोबत जॉर्ज फर्नांडीस होते, शरद यादव होते, नितीश कुमार होते, ममता बॅनर्जी होत्या, नवीन पटनायक होते, त्यामुळे मला वाटते की, तसे परिवर्तन समाजात झालेले आहे," असेही आठवले यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Politicsराजकारण