शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

इतना सन्नाटा क्यों है भाई?; अर्थव्यवस्थेवरुन शिवसेनेचा मोदी सरकारवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:46 PM

दिवाळीतील उलाढालीचा संदर्भ देत मोदी सरकारच्या आर्थिक अपयशावर बोट

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं बहुमताचा आकडा गाठला असला तरी, सरकार स्थापनेला उशीर होत आहे. भाजपा, शिवसेनेनं दबावाचं राजकारण सुरू केल्यानं सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. बहुमतापासून दूर राहिलेल्या भाजपाला सरकार स्थापनेसाठी शिवसेनेची आवश्यकता आहे. त्यामुळे शिवसेनेनं संधी साधत भाजपावर दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. राज्यात ही परिस्थिती असताना आर्थिक आघाडीवरील चिंताजनक परिस्थितीवरुनही शिवसेनेनं मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.देशातील जनता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत दिवाळी साजरी करत असली तरी देशाच्या आर्थिक क्षेत्रात मात्र दिवाळी साजरी करावी असे वातावरण कुठेच दिसत नाही. ऐन दिवाळीत बाजारपेठांत शुकशुकाट आहे आणि ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून देशातील पैसा विदेशी कंपन्यांच्या तिजोऱ्या भरत आहे. दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात झालेल्या निवडणुकांतही धुमधडाका कमी आणि शुकशुकटाच अधिक झाला. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व पातळ्यांवरील हा शुकशुकाट एकच सवाल करतो आहे... 'इतना सन्नाटा क्यों है भाई?' असं सामनानं अग्रलेखात म्हटलं आहे.केंद्रातील मायबाप सरकार सांगतं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. शेतकरीही त्यासाठी खूप काबाडकष्ट घेतात, पण मध्येच नैसर्गिक आपत्ती येते आणि कित्येकदा शेतीवर केलेल्या खर्चाएवढेही उत्पन्न निघत नाही. त्यावर काय उपाय करायचा हे कोणीच सांगत नाही. आज देशभरात आर्थिक मंदी आहे. दिवाळीसाठी म्हणून बाजारपेठेत फटाक्यांबरोबरच खरेदीचा जो धुमधडाका असायला हवा, तो अजूनही दिसत नाही, अशा शब्दांत सामनानं आर्थिक आघाडीवर अपयशी ठरलेल्या मोदी सरकावर निशाणा साधला आहे.वसुबारस, धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन पार पडले. पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दोन दिवस आणखी शिल्लक आहेत. मात्र मंदीच्या सावटामुळे 30 ते 40 टक्के खरेदी कमी झाल्याने बाजारपेठांतील रौनकच हरवली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीपासून देशावर ओढवलेले आर्थिक अरिष्ट कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. कारखानदारी धोक्यात आली आहे, उद्योगधंदे बंद पडत आहेत, रोजगारनिर्मिती ठप्प झाली आहे, रोज नवनवीन कंपन्या आणि प्रतिष्ठाने स्वत:ला दिवाळखोर जाहीर करत आहेत. बँकांचे दिवाळे वाजताना दिसत आहे, असं म्हणत शिवसेनेनं सामनामधून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.जनतेचा खिसा तर रिकामा झाला आहेच, पण सरकारी तिजोरीतही खडखडाटच दिसतो. त्यामुळेच युद्धकालीन परिस्थितीसाठी राखून ठेवलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतील पावणेदोन लाख कोटी रुपये काढून घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. घरातले सोने मोडण्यासाठी आजवर जनताच सराफांकडे जात असे. पण आता तर देशातील रिझर्व्ह बँकही आपल्याकडील सोन्याचा साठा मोडायला निघाली आहे, असं म्हणत शिवसेनेनं मोदी सरकारच्या आर्थिक अपयशावर बोट ठेवलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEconomyअर्थव्यवस्थाDiwaliदिवाळी