शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? : पाठ्यपुस्तकांच्या भगवेकरणाचा आरोप संचालकांनी फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 13:22 IST

"आम्हाला हिंसक नव्हे चांगले नागरिक घडवायचे आहेत."

 लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : दंगलीबद्दल शिकवल्याने हिंसक व वैफल्यग्रस्त नागरिक निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शालेय पाठ्यपुस्तकांतील गुजरात दंगल, बाबरी मशीद संबंधित संदर्भ सुधारण्यात आले आहेत, असे राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी स्पष्ट केले. शालेय अभ्यासक्रमाचे भगवेकरण केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. 

पाठ्यपुस्तकांतून गुजरात दंगल व बाबरी मशीद संदर्भातील बदलाबाबत छेडले असता सकलानी म्हणाले की, आम्ही शालेय विद्यार्थ्यांना दंगलीबाबत का शिकवावे? आम्हाला हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक नाही तर सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत.  शालेय पाठ्यपुस्तकांतून त्यांना हे धडे का द्यावेत? विद्यार्थ्यांनी आक्रमक व्हावे, समाजात द्वेष निर्माण करावा आणि स्वत:ही द्वेषाला बळी पडावे अशा पद्धतीने आपण त्यांना शिकवायचे काय? आपण बालकांना दंगलीबाबत शिकवले पाहिजे का... ते जेव्हा मोठे होतील तेव्हा ते याबाबत शिकू शकतात; परंतु शालेय पाठ्यपुस्तकांतून त्यांना हे धडे का द्यावेत? मोठे झाल्यानंतर त्यांना हे समजू द्या की काय झाले, का झाले. बदलांबाबत ओरड करणे  अनावश्यक आहे.

पुस्तकात नवीन काय?अनेक संदर्भ वगळून आणि बदलांसह नवी पाठ्यपुस्तके बाजारात आली. तेव्हा सकलानी यांनी त्यांची भूमिका मांडली. इयत्ता १२ वीच्या राज्यशास्त्राच्या सुधारित पाठ्यपुस्तकात बाबरी मशिदीचा थेट उल्लेख नाही. त्याला मशिदीऐवजी तीन घुमटाचा ढाचा असेे संबोधण्यात आले आहे. अयोध्या वादावरचा इतिहास चार पानांवरून दोन पानांवर आणला गेला आहे.  आधीच्या आवृत्तीतील तपशील वगळण्यात आला आहे. सुधारित धड्यात राम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे दिसते. न्यायालयाचा हा निर्णय देशात व्यापक प्रमाणात स्वीकारण्यात आला होता. 

आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत. आम्ही त्यात सर्वकाही ठेवू शकत नाही. आमच्या शिक्षणाचा उद्देश हिंसक आणि नैराश्यग्रस्त नागरिक घडवणे हा नाही. द्वेष आणि हिंसाचार हे शिकवण्याचे विषय नाहीत. आमची पाठ्यपुस्तके त्यावर केंद्रित असू नयेत. १९८४ च्या दंगलीचा पुस्तकांमध्ये उल्लेख नसल्यावरून असा गदारोळ होत नाही.      - दिनेश प्रसाद सकलानी, संचालक, एनसीईआरटी

काय वगळले ?भाजपची गुजरातमधील सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशीद पाडल्यानंतर उसळलेला जातीय हिंसाचार, भाजपशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आणि भाजपने अयोध्येतील घटनांबद्दल खेद व्यक्त करणे आदी संदर्भ पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आले आहेत.

हे भगवेकरण कसे ?- काही गोष्ट अप्रासंगिक झाली असेल तर... ती बदलावी लागेल. ती का बदलू नये. मला येथे भगवेकरण दिसत नाही. आम्ही इतिहास शिकवतो. त्यामुळे वस्तुस्थिती कळते.- आपण भारतीय ज्ञानप्रणालीबद्दल सांगत आहोत, तर ते भगवेकरण कसे असू शकते? जर आपण मेहरौलीतील लोखंडी खांबाबद्दल सांगत आहोत आणि भारतीय हे धातूविज्ञान शास्त्रज्ञापेक्षा पुढे आहेत असे म्हणत आहोत, तर आपण चुकीचे काय सांगतोय ? हे भगवेकरण कसे असू शकते?"

टॅग्स :Educationशिक्षण