शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

'भारत माता की जय' घोषणेची मनमोहन सिंग यांना अडचण का ? मोदींचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2020 12:47 PM

या बैठकीत मोदींनी खासदारांना केवळ बोलण्याऐवजी काम करण्यावर भर देण्याची ताकीद दिली. प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावनेवर जोर द्यावा, असा संदेश दिला. 

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत माता की जय' या घोषणेवरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पलटवार केला आहे. मनमोहन सिंग यांना या घोषणेवर अडचण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत ते बोलत होते. देशात काही राजकीय पक्ष असे आहेत की जे स्वत: चा फायदा देशापेक्षा अधिक महत्त्वाचा मानत असल्याचा दावा मोदींनी यावेळी केला. 

गेल्या महिन्यात मनमोहन सिंग यांनी भारत माता की जय या घोषणेचा चुकीचा वापर करण्यात येत असल्याचे म्हटले होते. त्यावर मोदींनी विचारले की, भारत माता की जय या घोषणेत वावगं काय आहे. पुढे मोदी म्हणाले की, देश सर्वोच्च आहे. विकास करणे भाजपचा मंत्र असून त्यासाठी शांतता आणि सद्भावना आवश्यक आहे.

या बैठकीत मोदींनी खासदारांना केवळ बोलण्याऐवजी काम करण्यावर भर देण्याची ताकीद दिली. प्रत्येक खासदाराने शांतता, एकता आणि सद्भावनेवर जोर द्यावा, असा संदेश दिला. 

राष्ट्रवाद व ‘भारत माता की जय’ या घोषणेचा उग्रवादी विचारांसाठी वापर केला जात आहे, अशी घणाघाती टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली होती. जवाहरलाल नेहरू यांचे कार्य व विचार यावरील पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी भाजपचे नाव न घेता टीकास्त्र सोडले.