शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण...?" नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 04:50 IST

New Delhi Railway Station Stampede: कुंभमेळा सुरू आहे, हे सरकारला माहीत होते, तर त्यांनी अधिक गाड्या का चालवल्या नाहीत... रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था का केली गेली नाही...? या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? असे प्रश्न काँग्रेसने केले आहेत.

New Delhi Railway Station Stampede: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. तेथे जाण्यासाठी शनिवारी रात्रीच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी  गर्दी झाली होती. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल आहे. यात २ मुलांचाही  समेश आहे. याशिवाय १० लोक गंभीर जखमी असल्याचेही समजते.  प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ जवळील एस्केलेटरजवळ ही चेंगराचेंगरी झाली. विरोधी पक्षांनी या दुर्घटनेसाठी केंद्र सरकारच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.

यासंदर्भात काँग्रेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर म्हटले आहे की, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर कुंभमेळ्यासाठी जात असलेल्या अनेक बाविकांच्या मृत्यूची बातमी वेदनादायी आहे. काँग्रेस कुटुंबाच्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. या दुःखाच्या वेळी, देव शोकाकुल कुटुंबांना शक्ती देवो आणि जखमी लवकरात लवकर बरे होवोत. मोदी सरकारने मृतांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांना सोपवून त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करावी आणि सर्व जखमी भाविकांना योग्य आणि चांगले उपचार देण्यात यावेत," असेही म्हटले आहे. याच वेळी काँग्रेसने सरकारला काही प्रश्नही केले आहेत ते असे... -- कुंभमेळा सुरू आहे, हे सरकारला माहीत होते, तर त्यांनी अधिक गाड्या का चालवल्या नाहीत. - रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था का केली गेली नाही?- या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण?

काय म्हणाले आप नेते संजय सिंह - याशिवाय, आप नेते संजय सिंह यांनीही एक्सवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "आमच्या जिवनाची काहीच किंमत  नाही का? दिल्ली रेल्वे स्थानकावरील गैरव्यवस्थापनामुळे चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यूंसाठी कुणी तर जबाबदार असेल? कुंभमेळ्यात मृत्या झाला तर म्हटले जाते "मोक्ष मिळाला". आता सरकार म्हणेन “कुणी सांगितलं होतं स्टेशनवर यायला?” माणूस मरो अथवा जगो सरकारची प्रतिमा चांगली रहायला हवी."

चौकशीसाठी रेल्वेकडून द्विसदस्यीय समितीची स्थापना -यासंदर्भात बोलताना रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले, "आज सायंकाळच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा खूप अधिक होती. यामुळे रेल्वेने नियमित गाड्यांसह विशेष गाड्या चालवल्या. काही वेळासाठी प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली, यामुळे काही लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या परिस्थिती सामान्य आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि आरपीएफ डीजी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

टॅग्स :delhiदिल्लीKumbh Melaकुंभ मेळाDeathमृत्यूAAPआपcongressकाँग्रेसPoliticsराजकारण