शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

"या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण...?" नवी दिल्ली रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीवरून विरोधकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 04:50 IST

New Delhi Railway Station Stampede: कुंभमेळा सुरू आहे, हे सरकारला माहीत होते, तर त्यांनी अधिक गाड्या का चालवल्या नाहीत... रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था का केली गेली नाही...? या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण? असे प्रश्न काँग्रेसने केले आहेत.

New Delhi Railway Station Stampede: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. तेथे जाण्यासाठी शनिवारी रात्रीच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी  गर्दी झाली होती. यामुळे येथे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली. येथे झालेल्या चेंगराचेंगरीत १५ जणांचा मृत्यू झाल आहे. यात २ मुलांचाही  समेश आहे. याशिवाय १० लोक गंभीर जखमी असल्याचेही समजते.  प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक १६ जवळील एस्केलेटरजवळ ही चेंगराचेंगरी झाली. विरोधी पक्षांनी या दुर्घटनेसाठी केंद्र सरकारच्या गैरव्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे.

यासंदर्भात काँग्रेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर म्हटले आहे की, "नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर कुंभमेळ्यासाठी जात असलेल्या अनेक बाविकांच्या मृत्यूची बातमी वेदनादायी आहे. काँग्रेस कुटुंबाच्या संवेदना पीडित कुटुंबांसोबत आहेत. या दुःखाच्या वेळी, देव शोकाकुल कुटुंबांना शक्ती देवो आणि जखमी लवकरात लवकर बरे होवोत. मोदी सरकारने मृतांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांना सोपवून त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करावी आणि सर्व जखमी भाविकांना योग्य आणि चांगले उपचार देण्यात यावेत," असेही म्हटले आहे. याच वेळी काँग्रेसने सरकारला काही प्रश्नही केले आहेत ते असे... -- कुंभमेळा सुरू आहे, हे सरकारला माहीत होते, तर त्यांनी अधिक गाड्या का चालवल्या नाहीत. - रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी कोणतीही व्यवस्था का केली गेली नाही?- या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण?

काय म्हणाले आप नेते संजय सिंह - याशिवाय, आप नेते संजय सिंह यांनीही एक्सवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे, "आमच्या जिवनाची काहीच किंमत  नाही का? दिल्ली रेल्वे स्थानकावरील गैरव्यवस्थापनामुळे चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू झाला. या मृत्यूंसाठी कुणी तर जबाबदार असेल? कुंभमेळ्यात मृत्या झाला तर म्हटले जाते "मोक्ष मिळाला". आता सरकार म्हणेन “कुणी सांगितलं होतं स्टेशनवर यायला?” माणूस मरो अथवा जगो सरकारची प्रतिमा चांगली रहायला हवी."

चौकशीसाठी रेल्वेकडून द्विसदस्यीय समितीची स्थापना -यासंदर्भात बोलताना रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार म्हणाले, "आज सायंकाळच्या सुमारास नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या नेहमीपेक्षा खूप अधिक होती. यामुळे रेल्वेने नियमित गाड्यांसह विशेष गाड्या चालवल्या. काही वेळासाठी प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली, यामुळे काही लोक बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या परिस्थिती सामान्य आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि आरपीएफ डीजी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यासाठी द्विसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

टॅग्स :delhiदिल्लीKumbh Melaकुंभ मेळाDeathमृत्यूAAPआपcongressकाँग्रेसPoliticsराजकारण